AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साईबाबांच्या शिर्डीतील अख्खं विमानतळ होणार जप्त? नोटीस पाठवली, काय आहे प्रकरण?

shirdi international airport: विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा झाली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे.

साईबाबांच्या शिर्डीतील अख्खं विमानतळ होणार जप्त? नोटीस पाठवली, काय आहे प्रकरण?
shirdi international airport
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 09, 2024 | 1:32 PM
Share

शिर्डी येथील साईबाबा देवस्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डी आहे. यामुळे शिर्डीत देशभरातून भाविक येत असतात. त्यासाठी शिर्डी सारख्या छोट्या शहराचा विकास चांगला करण्यात आला. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सुरु करण्यात आले. त्याच शिर्डीतील विमानतळाला आता नोटीस देण्यात आली आहे. आठ कोटी तीस लाखांचा कर थकल्या प्रकरणात शिर्डी विमानतळाला ही नोटीस शिर्डी ग्रामपंचायतीने बजावली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही नोटीस बजावल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

8 कोटी 30 लाखांचा कर थकवला

शिर्डी विमानतळ हे कोपरगाव तालुक्यातील काकडी – मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. विमानतळ प्राधिकारणाने काकडी ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाखांचा कर थकवला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले आहे. 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरुपातील कर थकीत आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही थकबाकी जमा होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे.

ग्रामपंचायतीच्या विकासात अडथळे

शिर्डी विमानतळाची उभारणी करताना गावातील हजारो हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाठी निधी देण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाने दिले होते. मात्र या सर्व आश्वसनांची पुर्तता झाली नाही. त्यातच ग्रामपंचायतीचा 8 कोटी 30 लाखांचा कर प्राधिकरणाने थकवला आहे. कर थकल्याने गावातील विकासाला अडथळे निर्माण होत असल्यामुळे हे पाऊल उचलले आहे.

काय काय होणार जप्त

विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा झाली नाही. यामुळे ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस पाठवली आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचे वॉरंट ग्रामपंचायतीने बजावले आहे. कर जमा न केल्यास आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशारा सरपंच पूर्वी गुंजाळ आणि उपसरंपच भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?