AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे…’, गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते जिथे जातात तिथे सर्व काही संपतं असं पाटील यांनी म्हटलं आहे.

'ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे...', गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 7:17 PM
Share

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत?  यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत?  यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या, आता  वेळ काही लांब नाहीये,  विधानसभेच्या वेळी गद्दारांना पाडू, अशी भीष्म प्रतिज्ञा करत होते, मफलर मागेपुढे करत होते. हे पांढरे पायाचे आहेत, जिथे जातात तिथे सर्व काही संपतं. जळगावमध्ये देखील पक्षाला हे त्याच स्टेजवर घेऊन आलेले आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

राऊत, सुरेश जैन यांच्या भेटीवर प्रतिक्रिया  

दरम्यान संजय राऊत यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली, या भेटीवर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे सुरेश दादा जैन उभे राहतात. यांनी कितीही लाडीगोडी लावलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सरनाईक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया 

मुंबईची बोलीभाषा ही हिंदी झाली आहे, असं वक्तव्य प्रतापराव सरनाईक यांनी केलं आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी हा आमच्या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मराठी ही बोलली पाहिजे आणि हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे, प्रताप सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....