AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे…’, गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते जिथे जातात तिथे सर्व काही संपतं असं पाटील यांनी म्हटलं आहे.

'ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे...', गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 7:17 PM
Share

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत?  यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत?  यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या, आता  वेळ काही लांब नाहीये,  विधानसभेच्या वेळी गद्दारांना पाडू, अशी भीष्म प्रतिज्ञा करत होते, मफलर मागेपुढे करत होते. हे पांढरे पायाचे आहेत, जिथे जातात तिथे सर्व काही संपतं. जळगावमध्ये देखील पक्षाला हे त्याच स्टेजवर घेऊन आलेले आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

राऊत, सुरेश जैन यांच्या भेटीवर प्रतिक्रिया  

दरम्यान संजय राऊत यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली, या भेटीवर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे सुरेश दादा जैन उभे राहतात. यांनी कितीही लाडीगोडी लावलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सरनाईक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया 

मुंबईची बोलीभाषा ही हिंदी झाली आहे, असं वक्तव्य प्रतापराव सरनाईक यांनी केलं आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी हा आमच्या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मराठी ही बोलली पाहिजे आणि हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे, प्रताप सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.