AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे…’, गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते जिथे जातात तिथे सर्व काही संपतं असं पाटील यांनी म्हटलं आहे.

'ते पांढऱ्या पायाचे जिथे जातात तिथे...', गुलाबराव पाटलांचा राऊतांना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2025 | 7:17 PM
Share

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत?  यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गद्दारांना पाडेल असं त्यांनी म्हटलं होतं, मात्र त्यांना उमेदवार देखील मिळाला नाही. आणि जे मिळाले ते निवडून आले नाहीत, खातं देखील उघडलं नाही. आता महापालिका निवडणुकांमध्ये काय करणार आहेत?  यांच्यासोबत जे लोक आहेत, ते देखील यांच्यावर नाराज आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या, आता  वेळ काही लांब नाहीये,  विधानसभेच्या वेळी गद्दारांना पाडू, अशी भीष्म प्रतिज्ञा करत होते, मफलर मागेपुढे करत होते. हे पांढरे पायाचे आहेत, जिथे जातात तिथे सर्व काही संपतं. जळगावमध्ये देखील पक्षाला हे त्याच स्टेजवर घेऊन आलेले आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

राऊत, सुरेश जैन यांच्या भेटीवर प्रतिक्रिया  

दरम्यान संजय राऊत यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली, या भेटीवर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे सुरेश दादा जैन उभे राहतात. यांनी कितीही लाडीगोडी लावलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

सरनाईक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया 

मुंबईची बोलीभाषा ही हिंदी झाली आहे, असं वक्तव्य प्रतापराव सरनाईक यांनी केलं आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी हा आमच्या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मराठी ही बोलली पाहिजे आणि हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे, प्रताप सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.