AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं परंतु…’, शहाजी बापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

'संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं परंतु...', शहाजी बापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Jun 21, 2025 | 3:36 PM
Share

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती, अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत, उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेत दोन गट पडले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट.

दरम्यान या घटनेच्या तीन वर्षांनंतर आता शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना गुवाहाटीला यायचे होते, परंतु आमदारांचा विरोध होता, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तीन वर्षानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे, या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील? 

गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले, तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.