AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं परंतु…’, शहाजी बापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

'संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं परंतु...', शहाजी बापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Jun 21, 2025 | 3:36 PM
Share

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती, अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत, उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेत दोन गट पडले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट.

दरम्यान या घटनेच्या तीन वर्षांनंतर आता शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना गुवाहाटीला यायचे होते, परंतु आमदारांचा विरोध होता, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तीन वर्षानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे, या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील? 

गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले, तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवलं आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.