AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena: वरुण सरदेसाई यांच्यासमोर उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या गौप्यस्फोट, म्हणाले…

कैलास पाटील म्हणाले की -शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारीचे तिकीट दिले. त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख निर्माण करुन दिली आणि ज्यांनी ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करायची नाही. असेही पाटील यावेळी म्हणाले. कितीही अमिषे आली तरी आपण आणि खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाहीत.

Shivsena: वरुण सरदेसाई यांच्यासमोर उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या गौप्यस्फोट, म्हणाले...
काय म्हणाले कैलास पाटील?Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 7:39 PM
Share

उस्मानाबाद – उद्धव ठाकरेंची साथ (Uddhav Thackeray)आणि शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. असा गौप्यस्फोट उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil)यांनी केला आहे. शिंदे गटाकडून कधी आमिषे, ऑफर देण्यात येत आहेत. तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे आमदार कैलास पाटील म्हणालेत. मात्र कितीही ऑफर आल्या, दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासाही आमदार कैलास पाटील यांनी केला. आजही काही सहकारी आमदारांच्यामार्फत निरोप येतात, सगळेच निरोप जाहीर सांगायचे नसतात. असे सांगत त्यांनी काय ऑफर व निरोप दिला जातोय हे गुलदस्त्यात ठेवले आहे.

खासदारांच्या उपस्थितीत गौप्यस्फोट

तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला यावेळी युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीला जाताना कैलास पाटील हे रस्त्यातूनच परत आले होते. आपल्याला फसवून नेल्याचा सांगत कैलास पाटील तात्काळ मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर या सुटकेची व घटनेची मोठी चर्चा झाली होती. शिवसेनेतील निष्ठावान आजही शिवसेनेच्याच बाजूने असल्याचे सांगताना उध्दव ठाकरे हे नेहमी कैलास पाटील यांचे उदाहरण देतात. त्याच कैलास पाटील यांनी आपल्याला आणखीही ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

भाषणात काय म्हणाले कैलास पाटील?

शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारीचे तिकीट दिले. त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख निर्माण करुन दिली आणि ज्यांनी ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करायची नाही. असेही पाटील यावेळी म्हणाले. कितीही अमिषे आली तरी आपण आणि खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाहीत. काही नेते जरी सोडून गेले तरी, सामान्य जनता शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे व राहणार असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!.
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?.
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.