AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death: मृतदेह जळाले, पण कागदपत्रं जळली नाहीत, कसं काय? दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित

Ajit Pawar Death: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात हलचाली वाढल्या आहेत, तर दुसरीकडे दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

Ajit Pawar Death:  मृतदेह जळाले, पण  कागदपत्रं जळली नाहीत, कसं काय? दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
अजित पवार
| Updated on: Feb 02, 2026 | 11:12 AM
Share

Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ – उतार पाहायला मिळत आहेत. राज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकस्मित निधन झालं आणि राज्याच्या राजकारणावर मोठं संकट आलं. सांगायचं झालं तर, बारामती येथे सभेसाठी जात असताना अजित दादा यांच्या विमानाचं लँडिंग होण्यापूर्वीच स्फोट झाला. अशा परिस्थितीत प्रश्नोत्तरांच्या राजकारणानंतर आता आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही सुरू होताना दिसत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वात आधी मिटकरी यांनी अपघातावर चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली… मिटकरी म्हणाले, ‘महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते अजित दादा आता आपल्यात नाहीत. अलिकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि ते प्रचारासाठी बारामतीला येत होते.”

मिटकरी यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे अमोर मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अजितदादांच्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणी अचानक मार्ग बदलला. पायलटलाही अचानक बदलण्यात आले. मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला की, कागदाचा एकही तुकडा जळाला नाही, पण मृतदेह जळाले. यामुळे काही प्रश्न निर्माण होतात आणि काही शंका निर्माण होतात.

मिटकरी पुढे म्हणाले, ‘मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे…आणि चौकशी होणार असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.’ एवढंच नाही तर, स्वतः केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुनिश्चित केली जावी.. असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

अजित पवार यांचं निधन… राज्यभरात शोककळा…

बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2025 सकाळी 8.30 वाजता अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं… अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. तर पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला… या दुर्दैवी अपघातात कॅप्टन सुमित कपूर, को-कॅप्टन शंभवी पाठक, सुरक्षा अधिकारी विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडेंट पिंकी माळी यांचं देखील निधन झालं आहे.

विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!.
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?.
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.