AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | एक काळी टोपीवाला होता…., उद्धव ठाकरे यांचा कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमधील जाहीर सभेतून राज्य सरकारवर विविध मुद्यांवरुन जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray | एक काळी टोपीवाला होता...., उद्धव ठाकरे यांचा कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल
| Updated on: Mar 05, 2023 | 8:44 PM
Share

खेड | उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल असताना अनेकदा सावित्रीबाई आणि महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली होती. हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. उद्धव ठाकरे हे खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“एक काळी टोपीवाला होता, गेला. त्याने शिवाजी महाराज यांचा अपमान केला, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत. दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते”, असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

ठाकरेंचं शिंदेना आव्हान

“जर तुम्हाला गर्व असेल, की आम्ही म्हणजे शिवसेना, आम्ही शिवसेना बांधली, तर घ्या स्वीकारा आव्हान. शिवसेना हे नाव बाजुला ठेवा आणि तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा जर त्यांना लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बांधून दाखवा”, असं थेट आव्हान ठाकरे यांनी यावेळेस शिंदेंना दिलं.

“दोघांना म्हणजे तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची आणि तुमच्या आई-वडिलांना तुमचं नाव वापरायची लाज वाटत नसेल, तर नाव लावा. मी तर उघडउघड बाहेर पडलोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय ते होऊन जाऊद्या”, असंही ठाकरे यांनी ठासून सांगितलं.

“नाव काय गोठवलं, चिन्ह काय गोठवलं, चिन्ह बदललं तरी आपण जिंकलो अंधेरीला. बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय? कधी ऐकलेत?बरं यांच्यातले असेही आहेत ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं सुद्धा नाही, ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार. ज्यांची राजकीय कारकीर्द गेल्या 10-15 वर्षात बहरली, तुमच्या सर्वांच्या कर्तुत्वाने कारकीर्द फुलली ते आपल्याला शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार शिकवणार?”, असा सवालही या उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“बाळासाहेबांचे विचार काय आहेत, ज्यावेळा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यात उद्योगधंदे येत होते. हे गद्दार तिथे जाऊन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यादेखत राज्याबाहेर उद्योग जाऊ लागले. हे उद्योग बाहेर जाऊ देणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत का?”, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.