AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या पुत्राला आमदारकीचे वेध; गुहागरमधून लढण्यास तयार

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघ अतिशय महत्त्वाची जागा आहे. येथे 2019 मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहेदव देवजी बेटकर यांना 26451 मतांनी हरवले होते. विशेष म्हणजे गुहागरचा लोकसभा मतदार संघ रायगड आहे. येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना नेते अनंत गिते यांचा 31438 मतांनी पराभव केला आहे.

शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या पुत्राला आमदारकीचे वेध; गुहागरमधून लढण्यास तयार
विक्रांत जाधव आणि भास्कर जाधव.
| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 10:17 AM
Share

रत्नागिरीः शिवसेनेचे (Shivsena) दबंग नेते, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे पुत्र आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असलेले विक्रांत जाधव यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. संधी मिळाल्यास आपण गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे विधानसभा दूर असतानाही अनेकांनी आत्तापासूनच त्याची पायाभरणी करायला सुरुवात केलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघ अतिशय महत्त्वाची जागा आहे. येथे 2019 मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहेदव देवजी बेटकर यांना 26451 मतांनी हरवले होते. विशेष म्हणजे गुहागरचा लोकसभा मतदार संघ रायगड आहे. येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना नेते अनंत गिते यांचा 31438 मतांनी पराभव केला आहे. मात्र, आता विक्रांत जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट हवे आहे की, शिवसेनेकडून याचे सुतोवाच त्यांनी काही केले नाही. सध्या हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे तिकीट देताना पक्ष नेतृत्वाची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

काय म्हणतात विक्रांत…

विक्रांत जाधव म्हणाले की, गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. भास्कर जाधवांचे राजकीय वारसदार आणि लोकप्रतिनिघी म्हणून मी नक्कीच चांगले काम करेन. मला वडिलांकडून जनसेवेचा वारसा मिळाला आहे. आता तो वारसा पुढे चालवण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. या जिल्हा परिषदेची मुदत नुकतीच संपलीय. त्यानंतर त्यांनी आमदारकी लढवण्याचे संकेत दिलेत. मात्र, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असे वक्तव्य केले आहे.

अन् मार्ग झाला सुकर…

विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अंजनवेल (गुहागर) गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. भास्कर जाधव शिवसेनेत गेले. मात्र, त्यांचे पुत्र विक्रांत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. या ठिकाणी भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांचे पुत्र बाळाशेठ जाधवसुद्धा शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे भास्कर जाधव हे नाराज होते. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठीच विक्रांत जाधव यांच्या झेडपी अध्यक्षपदाचा मार्ग सुकर करण्यात आला होता. आता तेच तिकिटाबाबत होईल का, हे काळच सांगेल.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.