AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत

पंतप्रधानांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेत आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान आज मुंबईला येत आहेत, पण ते का येत आहेत ? जमिनी शोधायला येत आहेत का, की अडाणी ला कोणती जमीन द्यायची आहे. कोणती जमीन शिल्लक आहे का वरून पाहणार आहेत का ?

मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत
संजय राऊतांचे टीकास्त्र
| Updated on: Apr 01, 2024 | 12:43 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहत. RBI चा 90 वा वर्धापन दिन साजरा होत असून त्याच कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान आज मुंबईत आहेत. पंतप्रधानांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेत आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान आज मुंबईला येत आहेत, पण ते का येत आहेत ? जमिनी शोधायला येत आहेत का, की अदानीला कोणती जमीन द्यायची आहे. कोणती जमीन शिल्लक आहे का वरून पाहणार आहेत का ? असा बोचरा सवाल विचारत राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

गेल्या काही वर्षात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मुंबई विकली. गौतम अदानी, या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकले. मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले.आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार ? आता त्यांना काय विकायचे आहे ? असा खोचक सवालही राऊत यांनी विचारला.

Live

Municipal Election 2026

04:45 PM

Maharashtra Election Results 2026 : धुळे महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता...

04:27 PM

Pune Nagarsevak Election Results 2026 : सोनाली आंदेकर विजयी, थेट जेलमधून...

04:01 PM

Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका

03:17 PM

Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी

04:44 PM

पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत

04:27 PM

हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला

मोदींनी मुंबईत दहा नाही 100 सभा घ्याव्यात, पण मुंबईतून भाजप हा पूर्णपणे तडीपार करायचा असं मुंबईच्या जनतेने ठरवलंच आहे, असेही राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाही..

नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते आता नाही. निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात किंवा देशात किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. आणि जर ते सरकारी विमान आणि फौज फाटा घेऊन गेले, तर निवडणूक आयोगाने त्या संदर्भातला खर्चाचे बिल त्यांना पाठवायलं हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून ते पैसे वसून करायला हवेत, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधानांकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमानात सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहेत, घोषणा करत आहेत. त्यांचा एक एक दौरा हा 25 -25 कोटीचा असतो. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का ? काँग्रेस साठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस साठी आहे .नोटीसा फक्त आम्हालाच देणार का ? असा सवाल राऊत यांनी विचारला.

प्रधानमंत्री ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत आणि सरकारी यंत्रणा घेऊन प्रचाराला उतरले आहेत, हा भ्रष्टाचार नाही का? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, अस आरोपही राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

आशिष शेलारांवरही टीकास्त्र

ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. शेलार यांना काल माननीय उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल आहे.आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो,त्यांनी मणिपूरला जावं. तिकडे महिलांवर ती अत्याचार झाले आहेत ते पाहावे. कश्मीरी पंडितांचे हालहवाल समजून घेण्यासाठी त्यांना आम्ही जम्मू-काश्मीरला पाठवायला तयार आहोत .आमच्या खर्चाने त्यांनी जाऊन यावं, उगाच बकवास करू नये आणि तोंडाची वाफ घालवू नये अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात मविआच्या जागावाटपावर आता चर्चा होणार नाही !

महाराष्ट्रात जागावाटपावरची चर्चा बंद झाली पाहिजे. महाराष्ट्रात ही चर्चा आता बंद झाली आहे. चर्चा करायचीच असेल तर आगामी विधानसभा किंवा मग 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीची आम्ही चर्चा करू, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.

वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.
चंद्रपूरात भाजपला मोठा धक्का! काँग्रेस उमेदवारानं थेट महापौराला पाडलं!
चंद्रपूरात भाजपला मोठा धक्का! काँग्रेस उमेदवारानं थेट महापौराला पाडलं!.
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशीन बदलल्याचा आरोप
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशीन बदलल्याचा आरोप.
कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी
कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी.
पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच...
पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच....
चिंचवडमध्ये भाजप आमदार अमित गोरखेंच्या आई पिछाडीवर
चिंचवडमध्ये भाजप आमदार अमित गोरखेंच्या आई पिछाडीवर.
नितेश राणेंची ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच टीका, एकही शब्द न बोलता
नितेश राणेंची ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच टीका, एकही शब्द न बोलता.