AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकासाठी महायुतीची मोर्चेबांधणी, शिंदे गटाच्या आमदाराने सांगितला पूर्ण प्लॅन

सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांवर प्रकाश टाकला. त्यांनी भाजपची तयारी आणि राजकीय समीकरणे स्पष्ट केली. पक्षाच्या आंतरिक सर्व्हे आणि विरोधी पक्षांच्या हालचालींबद्दल त्यांनी आपले विचार मांडले.

महापालिका निवडणुकासाठी महायुतीची मोर्चेबांधणी, शिंदे गटाच्या आमदाराने सांगितला पूर्ण प्लॅन
devendra fadnavis eknath shinde ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2025 | 12:22 PM
Share

सध्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. यात भाजपही आघाडीवर आहे. याच संदर्भात सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.

संजय शिरसाट यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय शिरसाट यांनी महापालिका निवडणुकीत मोठा भाऊ कोण? या प्रश्नावर भाष्य केले. “कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ हे अजून ठरलेले नाही. याला अजून वेळ आहे. आताच याबाबत काही सांगितले तर वाद निर्माण होऊ शकतो. कोणत्या ठिकाणी कोणता पक्ष निवडणूक लढवतो, त्यानंतरच सर्वेक्षणांना महत्त्व येईल, असे संजय शिरसाट म्हणाले.

निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. त्यानुसार फीडबॅक घेऊन अहवाल पक्षाकडे सादर करतात. विधानसभेत असे सर्व्हे झाले, मात्र त्यातील ८० टक्के सर्व्हे चुकीचे निघाले. त्यामुळे या अंदाजांवर राजकीय गणित बांधणे चुकीचे आहे. पक्षाची नेमकी परिस्थिती काय, याचा आढावा अशा सर्व्हेतून घेतला जातो,” असे संजय शिरसाट म्हणाले. हा सध्या प्राथमिक सर्व्हे आहे. यानंतर अजून दोन सर्व्हे होतील, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.

हा फक्त अंदाज

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केले. “हा फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे, असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. आपला भगवा मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे, असा विश्वासही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

तिन्ही नेते मिळून मार्ग काढू

शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना संजय शिरसाट यांनी कालची बैठक पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि संघटनात्मक बाबींवर असल्याचे सांगितले. “काम करताना काय अडचणी येतात, याबाबत आमदारांनी सांगितले आहे. मात्र, शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की, कुठेही वाच्यता करू नका. तिन्ही नेते मिळून मार्ग काढू असे म्हटले आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?