AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भर सभेत आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही... नाही... नाही... अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. मात्र, त्याच राष्ट्रवादीसोबत ते गेले. फडणवीस बोलतात त्यांच्या उलटं वागत आले आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य
AM EKNATH, DCM DEVENDRA AND DCM AJITImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 15, 2023 | 9:47 PM
Share

कराड : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने विरोधकांची संख्या कमी झाली आहे. त्यातच विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते अभावी हे अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांची कशी कोंडी करणार हा प्रश्न आहे. तर, विरोधकांवर सत्ताधारीच हावी होण्याची चिन्हे आहेत. अशातच काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. यामुळे महाविकास आघाडीतही सारं काही आलबेल आहे असे वातावरण नाही.

विधानसभेत आमचे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे. तशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे. ही परिस्थिती का आली? एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं आजपर्यंत कधी झालं नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही, अशी टीका करतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलीय.

माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब थोरात कराड येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही… नाही… नाही… म्हणणारे अखेर त्यांच्यासोबतच गेले. फडणवीस जे बोलतात त्यांच्या उलट वागत आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

एक मुख्यमंत्री, एक पूर्वीचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री, दुसरा एक उपमुख्यमंत्री झाला. त्याला आता मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. पण इथे आता तीन तलवारी एका म्यानात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात सगळीकडे भष्टाचार चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून जनतेत प्रचंड नाराजी आहे. आमदारांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात असे सरकार नको. त्यापेक्षा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केली.

Follow Us
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!
ठाकरेंच्या शिवतीर्थावर राऊत दाखल; बंद दाराआड चर्चा, नेमकं काय शिजतंय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या...
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका...
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...
प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप, अचानक...
बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा... प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...