
बळीराजाला बारा महिने चोवीस तास साथ देणारी असतात तिची जनावरं. तिच त्याची जीव की प्राण. मंद्रूप ते मुंबई या बैलगाडी आंदोलनात शेतकऱ्यांना खरी साथ आहे ती बैलांची, सर्जा-राजांची.

आमच्या 7/12 उताऱ्यावरील एआयडीसीचा नोंद काढण्यासाठी मंद्रूप ते मुंबई या शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चात सहभागी झालेला शेतकरी...

बळीराजा शेतात असो नाहीतर आंदोलनात असो त्याच्या हातवर कांदा मुळा भाजी असली की तो कोणत्याही परिस्थितीत दोन हात करायला तयार असतो.

मंद्रूप ते मुंबई असा निघालेल्या बैलगाडी मोर्चात पोटासाठी भाकरी आणि चटणी सोयही शेतकऱ्यांनीच केली आहे.

मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा सोलापूरात विश्रांती घेत, त्या क्षणभराच्या विश्रांतीत पोटाची भूक भागवणारा बळीराजा...

सोलापूरात थांबलेल्या बैलगाडी आंदोलनात जेवणाची सोयही शेतकऱ्यांनीच केली आहे.

बैलगाडी आंदोलनासाठी मजल दरमजल करत निघालेल्या मोर्चाने सोलापूरात घडीभर विश्रांती घेतली आहे.