Supriya Sule| एका नोटिशीनं एढं भाषण बदलेल हे माहीत नव्हतं, सुप्रिया सुळे यांची राज ठाकरेंवर खोचक टीका

| Updated on: Apr 03, 2022 | 10:36 AM

विकासावर त्यांना बोलण्यासारखे काहीच या राहिले नाही. कारण मागील दोन - अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने इतका उत्तम काम केलं आहे. त्यामुळे विकासाला विरोध करण्यासारख काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे भावनिक विषयांवर बोलून राजकारण सुरु आहे.

Supriya Sule| एका नोटिशीनं एढं भाषण बदलेल हे माहीत नव्हतं, सुप्रिया सुळे यांची राज ठाकरेंवर खोचक टीका
सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर टीका
Image Credit source: TV9
Follow us on

इंदापूर –   लाव रे तो व्हिडीओ नंतर एवढं भाषण कस काय बदलले. एका नोटिशीने एवढं भाषण बदलले माहिती नव्हतं. मात्र आम्हाला कितीही नोटिसा आल्या तरी आम्ही घाबरणार नाही. राष्ट्रवादीमुळे (NCP) जातीपातीचे राजकारण सुरू झालं हे त्यांनी याआधी पण म्हटलं आहे, त्यात नवीन काही नाही. असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्या म्हणाल्या ‘ते विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांनी आमच्या सरकारवर टीका करणे साहजिक आहे. एरवी लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिसीने इतके बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटत. महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जाती- पातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. ते या गोष्टी आधीही बोललेले आहेत. पवार साहेब गेली 55  वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात जे कार्यरत आहेत. त्याचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही. त्यांच्या पक्षासाठी याची गरज आहे

भावनिक विषयाला हात घालून राजकारण

विकासावर त्यांना बोलण्यासारखे काहीच या राहिले नाही. कारण मागील दोन – अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने इतका उत्तम काम केलं आहे. त्यामुळे विकासाला विरोध करण्यासारख काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे भावनिक विषयांवर बोलून राजकारण सुरु आहे. मात्र हे राजकारण देशाच्या आणि राज्याच्या हिताचं नाही. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

अडीच वर्षात केंद्राने एकादमडी दिली नाही

देशातील कष्टकऱ्यांमुळे आज आत्मनिर्भर भारत आहे.  शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशाची वेगळी ओळख निर्माण झालीय, करारा जबाब मी इथे कुणाला देणार . राष्ट्रवादीला संघर्ष करायची गरज नाहीय . जलजीवन मिशनच काम सर्वात जास्त महाराष्टात सुरू आहे. गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकारने एक पैसाही दिला नाही असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहेकेंद्र जर निधीतत कट छाट करणार असेल तर खासदारकीसाठी कुणी कशाला तिकीट मागणार, मी मात्र मागणार पक्षाकडे केंद्र सरकार भाषणं खूप होतात, धाडी होतात. चॅनेल्सवर मास्क लावा सांगत असतात . मात्र संसदेत एकही भाजपचा मंत्री मास्क घातलेला दिसला नाही. दादा जोपर्यंत मास्क घालतील तोपर्यंत आपणही मास्क घातला पाहिजे, दादांच सगळं ऐकतात.  इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द गावात पक्षप्रवेशाचा कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. भाजपमधून इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे,  त्यांच्या समर्थकसोबत  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रूपाली चाकणकर ,मंत्री दत्ता भरणे यंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

ED शिवाय देशात सध्या काहीच चालत नाही – Sharad Pawar यांचा खोचक टोला

Raj Thackeray यांच्या भुमिकेत सातत्य नसतं – Sharad Pawar यांची टीका

IPL 2022: मॅच हातात असताना ऋषभ पंतने विकेट फेकली, पराभवाचं खापर इतर फलंदाजांवर फोडलं