AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात.

शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं
शहाजीबापू पाटील
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 02, 2023 | 6:02 PM
Share

सोलापूर : शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं. त्यामुळं ते पुन्हा चर्चेत आलेत. याबाबत बोलताना शहाजीबापू म्हणाले, श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी गेलो होतो. पाच दिवस त्यांनी पंचकर्माच्या क्रिया केल्या. पोट साफ करण्यासाठी प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तेल अंगावर लावले. तसेच पावडर लाऊन शरीराला हलकं करून दिलं. पंचकर्म क्रिया पूर्ण झाल्यानंतर शिरोधारा केली. शिरोधारामुळं मन हलकं होतं. त्यानंतर तीन दिवस मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया केली. त्यांनी माझ्याकडून व्यायाम करून घेतला. प्राणायम करायला लावतात. सहा वेळा श्वास पोटात घ्यावा लागतो. छातीत आठ वेळा श्वास घ्यायला सांगतात. अशा काही श्वासाच्या क्रिया करून घेतात.

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व अवयवांवर लक्ष केंद्रीत करायला लावतात, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

डाव्या बाजूला लक्ष केंद्रीत करायला लावतात. ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर ध्यान कसं करायचं याचं मार्गदर्शन करतात. वीस मिनिटांचं ध्यान करून घेतात. शरीर व मन शांत होतं. वजन कमी होतं. मानसिक तणाव आणि चिंता कमी होते, अशी माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.

शहाजीबापू आधी काय झाडी काय डोंगर, या डायलॉगसाठी फेमस होते. आता ते वजन कसं कमी करायचं, यासाठी फेमस झाले. आठ दिवसांत वजन कमी करून त्यांनी आरोग्याचा आदर्श घालून दिला.

Follow Us
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं