AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात.

शहाजीबापूंचा आरोग्याचा मंत्र, बापूंनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं, कसं ते त्यांनी सांगितलं
शहाजीबापू पाटील
| Edited By: | Updated on: Jan 02, 2023 | 6:02 PM
Share

सोलापूर : शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसांत 9 किलो वजन घटवलं. त्यामुळं ते पुन्हा चर्चेत आलेत. याबाबत बोलताना शहाजीबापू म्हणाले, श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी गेलो होतो. पाच दिवस त्यांनी पंचकर्माच्या क्रिया केल्या. पोट साफ करण्यासाठी प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तेल अंगावर लावले. तसेच पावडर लाऊन शरीराला हलकं करून दिलं. पंचकर्म क्रिया पूर्ण झाल्यानंतर शिरोधारा केली. शिरोधारामुळं मन हलकं होतं. त्यानंतर तीन दिवस मेडिटेशन आणि सुदर्शन क्रिया केली. त्यांनी माझ्याकडून व्यायाम करून घेतला. प्राणायम करायला लावतात. सहा वेळा श्वास पोटात घ्यावा लागतो. छातीत आठ वेळा श्वास घ्यायला सांगतात. अशा काही श्वासाच्या क्रिया करून घेतात.

श्वासाच्या क्रिया झाल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो. त्यानंतर वीस मिनिटं शांत झोपायला लावतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व अवयवांवर लक्ष केंद्रीत करायला लावतात, असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

डाव्या बाजूला लक्ष केंद्रीत करायला लावतात. ही क्रिया पूर्ण झाल्यानंतर ध्यान कसं करायचं याचं मार्गदर्शन करतात. वीस मिनिटांचं ध्यान करून घेतात. शरीर व मन शांत होतं. वजन कमी होतं. मानसिक तणाव आणि चिंता कमी होते, अशी माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.

शहाजीबापू आधी काय झाडी काय डोंगर, या डायलॉगसाठी फेमस होते. आता ते वजन कसं कमी करायचं, यासाठी फेमस झाले. आठ दिवसांत वजन कमी करून त्यांनी आरोग्याचा आदर्श घालून दिला.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...