AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

लाख लाख दीड-दीड लाख बील येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट
| Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 8:04 PM
Share

सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर भीमा नदी आहे. कर्नाटकच्या सीमेवरील गावांना मोफत वीज पुरविली जाते. पाणीपट्टी घेतली जात नाही. महाराष्ट्राच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यातील कुडल हे गाव आहे. कुडलचे सरपंच म्हणाले, महाराष्ट्र मोठं राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहेत. पण, कर्नाटक राज्यानं बेळगावात सुखसोयी केल्या. त्यामुळं त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा कल नाही. अक्कलकोट तालुक्यातील सीमेवरील लोकांना चांगले रस्ते नाहीत. एसटीची वाहतूक नाही. पोरांना शिक्षणासाठी सोयीस्कर वातावरण नाही. चांगल्या शिक्षणासाठी वीस किलोमीटर जावं लागतं. कच्चा रस्ता आहे. गरीब लोकं शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत.

१९७२ साली सोलापूर आणि अक्कलकोटच्या दोन गाड्या होत्या. पण, आता त्या गाड्या बंद पडल्यात, असा आरोप कुडल येथील सरपंचांनी केला. रस्ते खराब असल्यानं या बस बंद करण्यात आल्यात. पोरांना जाण्यासाठी खाली वाहनानं जावं लागते. पण, रस्ते खराब आहेत. त्यामुळं येथील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत.

ज्येष्ठ नागरिक म्हणाले, १९८२ पासून आतापर्यंत आम्ही सीमेवर आहोत. पण, कर्नाटकमध्ये जाण्याचा आमचा विचार आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं आम्हाला वंचित ठेवलंय. रस्ते नाहीत. वीज नाही. पाण्याचा प्रश्न आहे.

कर्नाटक सरकारनं पाच किलोमीटर पाईपलाईन फुकट करून दिली आहे. सर्व सुखसोयी करून दिल्यात, तर आम्ही महाराष्ट्रात राहू. तुमच्या सावलीत जगू. पण, आवश्यक सुखसोयी करून दिल्या नाही तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असा इशाराचं ज्येष्ठ नागरिकांनी दिला.

दोन्ही राज्यातील फरकच ज्य़ेष्ठ नागरिकांनी स्पष्ट करून सांगितला. कर्नाटकात २४ तास वीज मिळते. आम्हाला आठ तास वीज मिळते. तरीही बील मात्र मोठ्या प्रमाणात वसूल केले जाते. लाख लाख दीड-दीड लाख बील येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.