AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

लाख लाख दीड-दीड लाख बील येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांचं म्हणणं काय, टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 09, 2022 | 8:04 PM
Share

सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर भीमा नदी आहे. कर्नाटकच्या सीमेवरील गावांना मोफत वीज पुरविली जाते. पाणीपट्टी घेतली जात नाही. महाराष्ट्राच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यातील कुडल हे गाव आहे. कुडलचे सरपंच म्हणाले, महाराष्ट्र मोठं राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहेत. पण, कर्नाटक राज्यानं बेळगावात सुखसोयी केल्या. त्यामुळं त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा कल नाही. अक्कलकोट तालुक्यातील सीमेवरील लोकांना चांगले रस्ते नाहीत. एसटीची वाहतूक नाही. पोरांना शिक्षणासाठी सोयीस्कर वातावरण नाही. चांगल्या शिक्षणासाठी वीस किलोमीटर जावं लागतं. कच्चा रस्ता आहे. गरीब लोकं शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत.

१९७२ साली सोलापूर आणि अक्कलकोटच्या दोन गाड्या होत्या. पण, आता त्या गाड्या बंद पडल्यात, असा आरोप कुडल येथील सरपंचांनी केला. रस्ते खराब असल्यानं या बस बंद करण्यात आल्यात. पोरांना जाण्यासाठी खाली वाहनानं जावं लागते. पण, रस्ते खराब आहेत. त्यामुळं येथील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत.

ज्येष्ठ नागरिक म्हणाले, १९८२ पासून आतापर्यंत आम्ही सीमेवर आहोत. पण, कर्नाटकमध्ये जाण्याचा आमचा विचार आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं आम्हाला वंचित ठेवलंय. रस्ते नाहीत. वीज नाही. पाण्याचा प्रश्न आहे.

कर्नाटक सरकारनं पाच किलोमीटर पाईपलाईन फुकट करून दिली आहे. सर्व सुखसोयी करून दिल्यात, तर आम्ही महाराष्ट्रात राहू. तुमच्या सावलीत जगू. पण, आवश्यक सुखसोयी करून दिल्या नाही तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असा इशाराचं ज्येष्ठ नागरिकांनी दिला.

दोन्ही राज्यातील फरकच ज्य़ेष्ठ नागरिकांनी स्पष्ट करून सांगितला. कर्नाटकात २४ तास वीज मिळते. आम्हाला आठ तास वीज मिळते. तरीही बील मात्र मोठ्या प्रमाणात वसूल केले जाते. लाख लाख दीड-दीड लाख बील येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.

Follow Us
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र