Manoj Jarange Patil : सरकारचा बडा नेता निघाला, रणरणत्या ऊन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना थोड्याचवळात भेटणार

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची काल राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती.

Manoj Jarange Patil :  सरकारचा बडा नेता निघाला, रणरणत्या ऊन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना थोड्याचवळात भेटणार
Manoj Jarange Patil
| Updated on: May 30, 2026 | 10:33 AM

अंतरवाली सराटीत रखरखत्या ऊन्हात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. ऊन्हाळ्याचे दिवस असून वरुन सूर्य आक ओकत आहे. मनोज जरांगे पाटील यांची काल राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती. काही वेळात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आश्वासनाचं पत्र घेऊन पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. संभाजीनगरहून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील रवाना झाले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीच्या परिसरात मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्ट मंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतरही ते उपोषणावर ठाम होते. आज मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज ड्राफ्ट मिळू शकतो. पण त्यांना ड्राफ्ट नकोय. ड्राफ्ट आम्ही स्वीकारु पण सरकारी अधिकाऱ्यांना आदेश द्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

तर तुम्हाला निलंबित करण्यात येईल

58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन वॅलिडिटी देण्यात यावी ही जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. सरकार प्रशासनाने तसा आदेश काढावा. कारण ड्राफ्ट सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. आदेश द्या जर प्रमाणपत्र वॅलिडिटी दिली नाही, तर तुम्हाला निलंबित करण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश पोहोचला पाहिजे असं ते म्हणाले. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढला तर सामान्य लोक तो सूचना, आदेश दाखवतील असं मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरु करताना बोलले. मला माझी फिकिर नाही. मराठा समाजाचं हित महत्वाचं आहे असं ते म्हणाले.

Follow Us