आता संपूर्ण देशच कोरोनाच्या हॉटस्पॉटकडे जातोय. देशात कोरोना किती वेगानं वाढतोय, याचे आकडे पाहिले तर, ही दुसरी लाट नव्हे, तर त्सुनामी आहे, यावर तुमचा विश्वास बसेल.
भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. हा विषाणू ट्रिप म्युटंट असल्याचं समोर आलंय. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या नव्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात नुकत्याच गेलेल्या जीनोम सिक्वेंसिंगमधून या नव्या विषाणूची आकडेवारी समजलीय. यानुसार नव्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत.
Follow us on
मुंबई : कालपर्यंत फक्त एकट्या महाराष्ट्राच्या नावानं बोंबाबोंब होती. मात्र, आता संपूर्ण देशच कोरोनाच्या हॉटस्पॉटकडे जातोय. देशात कोरोना किती वेगानं वाढतोय, याचे आकडे पाहिले तर, ही दुसरी लाट नव्हे, तर त्सुनामी आहे, यावर तुमचा विश्वास बसेल. उत्तर प्रदेशात 1 एप्रिलला 1198 रुग्ण निघाले. 5 एप्रिलला 4136, 10 एप्रिलला 9587 आणि 16 एप्रिलला 22 हजार 339 रुग्ण आढळले (Special report on Maharashtra corona and world situation).