AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरु झालं, राज ठाकरेंची जोरदार टीका

राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. डोंबिवली आणि ठाण्यात त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात दिसत असलेलं इतका जातीजातीत द्वेष कधीच पाहायला मिळत नव्हता. पवारांच्या काळात हे सुरु झालं असं ही ते म्हणाले.

जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरु झालं, राज ठाकरेंची जोरदार टीका
| Updated on: Nov 04, 2024 | 9:55 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात सभा घेतली. राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज सुरु असलेला जातीयवाद याआधी कधीही महाराष्ट्रात पाहिला नव्हता. फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरु केलं. पण आज पक्ष आणि चिन्हच ढापले जात आहेत. शिवसेना ही शिंदे किंवा उद्धव ठाकरेंची नाहीये तर ती बाळासाहेबांची आहे. तसेच राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘सगळ्या राजकारण्यांनी शहरांची, जिल्ह्यांची बजबजपुरी केलीये. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका. किती महापालिका. ही माणसं आली कुठून. पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेले लोकं कुठे राहत आहेत. ती कोण आहेत, ती आलू कुठून. कोणाचं लक्षच नाही याच्याकडे. मुंब्रा काय उगच वाढतंय का. काय होईल फार फार तर मतदार मरतील. पण राजकारण्यांना वेळ नाही. मतदानासाठी फक्त जीवंत राहा दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. नंतर मग फोडाफोडी. तुम्ही दिलेले मत आता सध्या कुठे फिरतंय. माझं मत कुणाकडे आहे.’

‘जातीवर प्रत्येकाला प्रेम असतं. पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरु झालं. त्याच्या मधनं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. मराठवाड्यात जाऊन बघा. असं वातावरण कधी नव्हतं. मराठ्याच्या दुकानात कोणी ओबीसी जात नाही. ओबीसीच्या दुकानात मराठा जात नाही. इतकं विष पसरवलं. महापुरुष देखील जातीमध्ये वाटण्याचं काम केलं. आपण नागरिक म्हणून याचा विचार करणार की नाही करणार आहोत.’

‘आताची ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज परत तीच मंडळी परत परत निवडून आली तर महाराष्ट्राला कोणा वाचवू शकत नाही. आज जे चिखलातून जे लोकं आले आहेत ते पुन्हा निवडून आले तर त्यांना वाटेल की आम्ही जे केलं ते योग्य केलं. मग पुढे काही खरं नाही. कोणी नाही वाचवू शकत. कोण कुठच्या विचाराचा याला काहीही अर्थ राहणार नाही. सगळ्यांकडून वाटोळे झालेलं पाहिलं ना. एकदा मला संधी देऊन बघा. राज ठाकरेला जर संधी दिली तर माझ्या लोकांना तुम्ही आशीर्वादच द्याल याची मला खात्री आहे.’ असं ही राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.