AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Jihad: श्रीरामपूर लव्ह जिहाद प्रकरण तापलं, हिंदूत्ववाद्यांच्या मोर्चानंतर पोलीस महानिरीक्षक थेट श्रीरामपुरात, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचण्याचे दिले आश्वासन

लव्ह जिहाद आणि मुलींना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथे पोलीस ठाण्याला भेट दिली.  यावेळी त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. आत्तापर्यंत चार प्रकरणे समोर आली असून काही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लव्ह-जिहाद प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचल्याशिवाय पोलीस थांबणार नाही. अशी ग्वाही यावेळी बी जी शेखर यांनी दिली आहे.

Love Jihad: श्रीरामपूर लव्ह जिहाद प्रकरण तापलं, हिंदूत्ववाद्यांच्या मोर्चानंतर पोलीस महानिरीक्षक थेट श्रीरामपुरात, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचण्याचे दिले आश्वासन
लव्ह जिहाद प्रकरणाची आयजींकडून दखलImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Sep 01, 2022 | 10:09 PM
Share

श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur)शहरात लव्ह जिहाद (Love Jihad)आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गेल्या चाळीस दिवसापासून बेपत्ता मुलींचा तपास लावावा आणि आरोपींना कठोर शासन करावे, या मागणीसाठी आज शिवप्रहार प्रतिष्ठाणने शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा (march on police station)काढला. श्रीरामपूर शहरातील लव्ह जिहादचा मुद्दा समोर आणल्यानंतर या प्रकरणात दररोज धक्कादायक घटना समोर येताना दिसताहेत. आत्तापर्यंत पाच मुलींची सुटका पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातुन झाली आहे. आणखी अनेक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडले असून, गेल्या चाळीस दिवसापासून बेपत्ता मुलीचा तपास लावावा या मागणीसाठी आज शिवप्रहार प्रतिष्ठानने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आरोपी मुल्ला कटर आणि त्याच्या साथीदारांनी अनेक मुलींचे जीवन उध्वस्त केले आहे. त्यासोबतच निकाह लावणारा काझी आणि इतरांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. या आंदोलनाची दखल थेट नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आहे. त्यांनी आज श्रीरामपूर पोलीस ठाण्याला भेट दिली.

काय म्हणाले पोलीस महानिरीक्षक?

लव्ह जिहाद आणि मुलींना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी श्रीरामपूर येथे पोलीस ठाण्याला भेट दिली.  यावेळी त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. आत्तापर्यंत चार प्रकरणे समोर आली असून काही आरोपींना पोलीसांनी जेरबंद केले आहे. लव्ह-जिहाद प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून, शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचल्याशिवाय पोलीस थांबणार नाही. अशी ग्वाही यावेळी बी जी शेखर यांनी दिली आहे. या दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नागरीकांनीही पुढे येवून पोलीसांना सहकार्य करण्याचं आवाहनही पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन विद्यार्थिनींना शाळेतून पळवून नेत त्यांच्याशी बळजबरीने निकाह लावण्याच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात येते आहे. या परिसरात 25 ते 26 जणांची टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. आत्तापर्यंत 10 हून जास्त मुलींचे अपहरण करुन त्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते आहे. या मुलींचे  धर्मांतरण करुन त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.  हा मुददा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा मांडला होता. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर