Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅलेट पेपरवर मतदान करण्याच्या मागणीला सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, आता पुढे काय?

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे.

बॅलेट पेपरवर मतदान करण्याच्या मागणीला सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, आता पुढे काय?
सुप्रीम कोर्ट
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 5:28 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता 3 दिवस झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला 230 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचं? याबाबत ठरवत होते. पण निकाल अतिशय वेगळा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या निकालावर संशय निर्माण करत आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा केला जातोय. या दरम्यान डॉ. के.ए पॉल यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात  दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, या याचिकेचे याचिकाकर्ता डॉ. के.ए पॉल आणि महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नसल्याची माहिती समोर येत आहे. महााविकास आघाडीकडून ईव्हीएमबाबत केवळ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. “ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पुण्यातील एका मतदारसंघात एकूण मतदान हे 3,65,000 इतकं झालं आहे. पण मतमोजणी 3,74,547 इतकी झाली आहे. याचाच अर्थ 9 हजार पेक्षा जास्त मतदानापेक्षा मतमोजणी झाली आहे. जे मतदान केंद्रात मतदानासाठी गेलेच नाहीत तर त्यांचे हे 9 हजार मतं कुठून आली? याचा अर्थ हे मॅनूप्लेशन आहे. हे 10 हजार मतं आली कुठून?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “मी महाविकास आघाडी किंवा राजकीय पक्ष पाहत नाही. पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय की, महाराष्ट्रात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. जी मतं दिलेलीच नाहीत ती मतं आली कुठून?”, असा सवाल त्यांनी केला.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.