AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरेंची उपस्थिती, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला वाटतं..

Supriya Sule : अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या विषयात त्या म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोठी चौकशी सुरु आहे. रिपोर्ट आल्याशिवाय यावर बोलणं योग्य नाही"

Supriya Sule : मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरेंची उपस्थिती, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला वाटतं..
Supriya Sule
| Updated on: Mar 30, 2026 | 11:50 AM
Share

“सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्याची जाणीव आहे. मागच्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी सहकार्याची भूमिका आम्ही घेतली. देश अडचणीत असेल सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचं असेल, तर सरकारने पारदर्शकपणे अडचण आहे हे मान्य करावं लागेल. लोढा यांनी पत्र लिहिलं. लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आभार मानते मी त्यांचे” असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भुजबळ म्हणतात पीएनजी कनेक्शन घ्या. तीन महिन्यांनी सिलिंडर मिळणार नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कनेक्शन द्या आमची तयारी आहे. सरकारने कनेक्शन द्यावं आम्हाला. तुम्ही मायबाप सरकार आहात. तुम्ही कनेक्शन द्या. आम्ही तयार आहोत. आम्हाला कनेक्शन मिळाल्याशी मतलब” शिवसेनेची भूमिका बदलत आहे. उद्धव ठाकरे यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा दिला आहे. निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला गेले. या प्रश्नावर सुप्रिया सुळे बोलल्या की, “मला वाटतं तुमची गल्लत होतेय. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे विषय आहेत. कोणी कोणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेलं त्यात गैर काय?. हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे”

मतभेद असावेत, मनभेद असू नयेत

“मी ज्या संस्कारात वाढले तिथे विरोधकाला शत्रू मानत नाही. मतभेद असावेत, मनभेद असू नयेत. मनभेद, शत्रू हे शब्द लोकशाहीत बसत नाहीत. कोणी कोणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेलं, त्यात काय एवढं बोलण्यासारखं. देशासमोर अनेक मोठी आव्हान आहेत. महागाई, डिझेल असे अनेक मुद्दे आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही कारवाई केली पाहिजे

या प्रकरणात महिलांचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत, त्यावर सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या. “मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, मीडियामधून हा जो मुद्दा मांडला जातोय तो महत्वाचा आहे. महिलांचे फोटो बाहेर जाऊ नयेत. एक नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, तुम्ही कारवाई केली पाहिजे. मीडियाने या विषयात जो संवेदनशीलपणा दाखवला त्यासाठी आभार मानते”

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.