AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना धक्का, पक्षातील नेत्याचा काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासचा निर्णय, मतदानापूर्वी भाजपला पाठिंबा

सुरेशदादा जैन यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या निर्णयाचा महायुतीला नक्कीच फायदा होणार आहे. ते आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे चिन्ह असले तरी निवडून आले आहे. अपक्षही निवडून आले आहेत. सुरेशदादा अवलिया माणूस आहे.

उद्धव ठाकरे यांना धक्का, पक्षातील नेत्याचा काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासचा निर्णय, मतदानापूर्वी भाजपला पाठिंबा
| Updated on: May 13, 2024 | 10:25 AM
Share

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथ्या टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, नंदुरबारसह ११ जागांवर मतदान होत आहे. या मतदानापूर्वी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्याने काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा राजीनामा दिला. परंतु खान्देशात प्रभाव असणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी आता भाजपला पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांनी राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी आता भाजपला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे धोरण व देश हितासाठी आपण भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी आपल्यावर भाजपचा कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले सुरेशदादा जैन

सुरेशदादा जैन यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपाला आपला पाठिंबा दिला. तसेच भाजपला मतदान करावे असे आवाहन केले आहे. परंतु आपण कोणत्याच पक्षात जाणार नाही. जो चांगले काम करणार त्याला पाठिंबा देणार असल्याचे सुरेशदादा जैन यांनी म्हटले.

सुरेशदादा जैन यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, दादांनी चाळीस वर्षाचा राजकारणात कधीच स्क्रिप्ट वाचलेले नाही. त्याच्यांवर नक्कीच कोणाचा तरी दबाव आहे.

गुलाबराव पाटील म्हणतात…

सुरेशदादा जैन यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरेशदादा जैन यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या निर्णयाचा महायुतीला नक्कीच फायदा होणार आहे. ते आतापर्यंत कोणत्याही पक्षाचे चिन्ह असले तरी निवडून आले आहे. अपक्षही निवडून आले आहेत. सुरेशदादा अवलिया माणूस आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो दबावापोटी घेतला नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी यापुढे लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असणार. मात्र सुरेशदादा जैन यांचे मार्गदर्शन जिल्ह्याला आवश्यक आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.