AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआय देशापेक्षा मोठं झालं का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंचा संताप, थेट केंद्र सरकारलाच सुनावलं

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयच्या आशिया चषकातील पाकिस्तानशी खेळण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रीय हिताला धोका निर्माण करतो असे म्हटले आहे.

बीसीसीआय देशापेक्षा मोठं झालं का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंचा संताप, थेट केंद्र सरकारलाच सुनावलं
aaditya thackeray
| Updated on: Aug 20, 2025 | 2:09 PM
Share

पाकिस्तानकडुन होणाऱ्या दहशतवादी हल्ले होत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकात पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी भारतीय संघ पाठवल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता याच संदर्भात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर बीसीसीआयची भूमिका आणि राष्ट्रीय हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दशकात आपल्या देशाला आणि नागरिकांना पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना वारंवार तोंड द्यावे लागले आहे. अलीकडेच माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’ असे म्हटले असतानाही, दुर्दैवाने, बीसीसीआय आशिया कपमध्ये पाकिस्तानशी खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. या कृतीमुळे असा प्रश्न निर्माण होतो की, बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा आणि आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

भूतकाळात अनेक राष्ट्रांनी मानवतेच्या भल्यासाठी खेळांमध्ये सहभाग घेतला नाही. दहशतवाद हा एक असाच मुद्दा आहे जो दोन्ही देशांना शांततेत प्रगती करू देत नाही. तरीही, केवळ पैशाच्या आणि जाहिरातींच्या हव्यासापायी बीसीसीआय आपल्या जवानांचे बलिदान आणि जीवन नगण्य मानते, असा आरोपही या पत्राद्वारे केला आहे. आम्ही जगाला शिष्टमंडळे पाठवून पहलघमच्या मागे पाकिस्तान आहे’ असे सांगितले. आता आम्ही जगाला शिष्टमंडळे पाठवून, आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहोत, याचे समर्थन करणार का? असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.

आदित्य ठाकरेंच्या पत्रात काय?

“गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशातील नागरिक आणि सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले वारंवार सहन केले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडली आहे.नुकतेच, माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे की, आता पाणी आणि रक्त दोन्ही एकत्र वाहू शकत नाहीत. तरीही, दुर्दैवाने आणि निर्लज्जपणे, बीसीसीआय (BCCI) आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. बीसीसीआयचे हे पाऊल राष्ट्रीय हितासाठी योग्य आहे का? हे पहलगाममध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा मोठे आहे का?

गेल्या अनेक वर्षांत, अनेक खेळाडू मानवाधिकारांचा भंग होत असल्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास नकार देत आहेत. दहशतवाद हे असेच एक कारण आहे जे शांततेने प्रगती होऊ देत नाही. तरीही, केवळ बीसीसीआयच्या हट्टामुळे, पैशाच्या लोभापायी, आपल्या जवानांच्या बलिदानाला कमी लेखले जात आहे. आम्ही जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवून पाकिस्तानची दहशतवादी बाजू उघड करत आहोत. आता आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असल्याबद्दल जगभरात आपली बाजू कशी योग्य ठरवणार?

पाकिस्तानने भारतातील खेळाडूंना वारंवार धमक्या दिलेल्या असताना, बीसीसीआयने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत सामने खेळणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आशा आहे की, जरी आपण राजकारणात वेगवेगळ्या बाजूने असलो तरी, या विचारावर आपण एकत्र येऊ. ज्याप्रमाणे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी आपल्या माननीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे आपण या प्रश्नावरही एकत्रितपणे पुढे जाऊ”, असे आदित्य ठाकरेंनी या पत्रात नमूद केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.