AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे ते डोंबिवली प्रवास २० मिनिटांत करता येणार? खासदार शिंदे यांचा दावा

माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला. मात्र आता या पुलाची उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठाणे ते डोंबिवली प्रवास २० मिनिटांत करता येणार? खासदार शिंदे यांचा दावा
| Edited By: | Updated on: Apr 02, 2023 | 8:06 AM
Share

ठाणे : ठाणे ते डोंबिवलीला जाण्यासाठी सध्या दीड तास लागतात. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ जातो. हा वेळ कसा कमी करता येईल, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यावर आता त्यावर उपाय निघालाय. हे प्रवासाचं अंतर लवकरचं कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. डोंबिवलीहून ठाण्याला रस्तामार्गे जाताना उल्हास नदी लागते. ही नदी ओलांडण्यासाठी सद्य:स्थितीत कल्याणच्या दुगार्डी किल्ल्याखेरीज कुठलाही पूल नाही. त्यामुळे वाहनचालकांना मुंबई-नाशिक महामार्गावरून राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुगार्डी ते कल्याण पूर्वेहून फिरून दीड तासांचा प्रवास करून यावे लागतो.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार प्रवास

माणकोली ब्रीज हा डोंबिवलीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या पुलामुळे हे दोन्ही शहरांत २० मिनिटांत जाता येणार आहे. या पुलाचे काम गतीने सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा पूल सुरू होणार आहे. अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

माणकोलीजवळ उभारला जातोय विशेष पूल

हा त्रास दूर करण्यासाठीच राजनोलीपासून जवळपास सहा किमी आधी माणकोलीजवळ विशेष पूल उभारला जात आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल संपणार आहे. या पूल उभारणीनंतर ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे. या पुलाचे मूळ नियोजन २०१३ मधील आहे.

९० टक्के काम पूर्ण

२०१६ मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ३६ महिन्यांत उभारणी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला. मात्र आता या पुलाची उभारणीचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा ब्रिज लोकांसाठी उघडणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. हा पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास डोंबिवलीहुन ठाण्याला अवघ्या २० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.