AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबाझरी ते गोसेखुर्द होणार पाण्यातून प्रवास?; नितीन गडकरी यांचं आणखी एक स्वप्न

या लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्याला एंट्री देऊ नका. कारण आमच्या प्रभागात तीर्थलंकार मंडळींची बरीच मेजारिटी आहे. विरंगुळा ज्येष्ठ नागरिकांचाही झाला पाहिजे.

अंबाझरी ते गोसेखुर्द होणार पाण्यातून प्रवास?; नितीन गडकरी यांचं आणखी एक स्वप्न
| Edited By: | Updated on: Apr 01, 2023 | 3:45 PM
Share

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ई लायब्ररीचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, या लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्याला एंट्री देऊ नका. कारण आमच्या प्रभागात तीर्थलंकार मंडळींची बरीच मेजारिटी आहे. विरंगुळा ज्येष्ठ नागरिकांचाही झाला पाहिजे. मुलांना अभ्यासही करता आला पाहिजे. नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने हशा पिकला.

पण, हा दोन किमीचा रस्ता बांधू शकलो नाही

नागपूर शहराला दूषित पाणी, कचऱ्यापासून मुक्त करायचं आहे. 40 हजार दिव्यांगांना साहित्य देऊन मदत केली. मी दिल्ली-मुंबई हा महामार्ग 1 लाख कोटी खर्च करून बांधला. पण मी केळीबाग रोडवरील 2 किलोमीटरचा एक रस्ता बांधू शकलो नाही. जेवढ्या खुट्या टाकायच्या आहे तेवढ्या टाकण्याचं काम झालं, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

कचऱ्याची लागणार विल्हेवाट

सात-आठ टाक्या पूर्ण झाल्यास शहरात २४ तास पाणी मिळेल. २४ शे कोटी रुपयांची नाग नदीची योजना राबविलं. या कामालाही सुरुवात झाली आहे. कचऱ्याची समस्या होती. जल, वायू प्रदूषणातून मुक्ती दिली पाहिजे. लिगसी कचरा १८ लाख टन आहे. याचे डिस्पोजल करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. तो कचरा आता एलअँडटीला पोहचवतो आहोत.

दिल्लीचा २० लाख टन कचरा दिल्लीतील रस्त्यांमध्ये टाकला. अहमदाबादचा २० लाख टन कचरा रस्त्यात टाकला. आता नागपुरातही कचऱ्याची विल्हेवाट लावणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

महालात राहायला येणार आहे

महालात राहायला येणार आहे. शहर बदलत आहे. बुधवार बाजारात मोठी बिल्डिंग बनत आहे. नंदाजीनगर चांगला झाला पाहिजे. मुलं शिकले पाहिजे. ज्येष्ठांना फिरायला चांगला बगिचा झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी १५ शे कोटी रुपये नागपूर शहराच्या विकासासाठी दिले.

कमी जागेत चांगले वाचनालय

झोपडपट्टीतील लोकांसाठी कमी जागेत सुंदर बिल्डिंग बांधली आहे. शाहू महाराज यांच्या नावाने ही लायब्ररी आहे. सुरेश भट सभागृह हे देशातल्या चांगल्या सभागृहांपैकी एक आहे. त्यावर सोलर लावण्यात आलं आहे. त्यामुळे विजेचं बील येत नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.