AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून तीन पथके स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर मागील सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून तीन पथके स्थापन
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून तीन पथके स्थापन
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 7:04 PM
Share

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर मागील सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी हल्लेखोरांची आणि त्यामागील सूत्रधारांची नावे देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला. या इशार्‍यानंतर कापूरबावडी पोलीस सक्रीय झाले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी तीन पथके गठीत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी आनंद परांजपे यांना दिली.

नेमकं प्रकरण काय?

आझम खान हे 12 जुलैला आपल्या पुतण्यासह भिवंडीच्या दिशेने काही कामानिमित्त जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार, लोखंडी सळई आदी हत्यारांच्या साहाय्याने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये आझम खान हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यामागील सुत्रधार मुन्ना, लकी आणि अकबर नामक स्थानिक गुंड असल्याची माहिती आझम खान यांनी देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला होता.

पोलिसांनी राष्ट्रवादीच्या शिष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली

पोलिसांनाी कारवाई न केल्याने आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्यावर धडकले. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी, आनंद परांजपे यांना आंदोलन न करण्यासंबधी विनंती केली. तसेच, पोलीस उपायुक्त विनय राठोड हे शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, शहर सरचिटणीस संदीप जाधव, ठाणे शहर युवाध्यक्ष विक्रम खामकर, आणि आझम खान यांची पोलीस उपायुक्त राठोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी भेट घेतली.

आरोपींना लवकरच अटक करणार, पोलिसांचं आश्वासन

यावेळी राठोड यांनी, आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यांची ओळखही पटलेली आहे. त्यामुळे त्यांना काही तासांमध्येच अटक करण्यात येईल, असे सांगितले. तर, आनंद परांजपे यांनी, सदर भागामध्ये   मुन्ना, लकी आणि अकबर नामक स्थानिक गुंडांची दहशत असून याआधीही त्यांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला रिव्हॉल्वरने धमकावले होते. सदरचा हल्ला हा सुपारी देऊन झाला आहे. याची दखल घेऊन जर न्याय दिला नाही तर, आपण सत्तेत असूनही पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला.

हेही वाचा :

राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी

यंदा पाऊसपाणी चांगला होऊ दे, शेतशिवारात, घराघरात समृद्धी येऊ दे, जगावरचं कोरोनाचं संकट दूर कर, अजितदादांचं पांडुरंगाचरणी साकडं

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.