ठाणे : मुंबईत वाहतूक कोंडी होत असते. त्यावरही आम्ही काम करणार आहोत. मी विरोधकांना कामातून उत्तर देईल. आरोप करण्याचा विरोधकांचा अधिकार आहे. ते त्यांनी करत राहावे. कुठे जायचं आणि कुठे नाही हा त्यांचा विषय आहे. शेवटी बाळासाहेब आणि दिघे साहेब आमचे दैवत आहेत. आता ज्याचे त्याने ठरवावे की कोठे जायचे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, आता निवडणूक झाली तर आमच्या जागा कमी येतील असा सर्वे आला. मात्र अशा प्रकारचे सर्वे अनेक येत असतात. त्याने काही होत नाही. काही मुठबर सँपल घेऊन वस्तुस्थिती मांडता येत नाही. त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीचा झालेला विजय पाहिला असेल तर सर्वे वेगळे असता.