AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेस जबाबदार धरीत मनसे आमदाराची जोरदार टीका

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पिसवली गावात माजी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात आमदार निधीतून रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.

ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिकेस जबाबदार धरीत मनसे आमदाराची जोरदार टीका
मनसे आमदाराची महापालिकेवर जोरदार टीका
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 10:59 PM
Share

डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील रस्त्यांची दुरावस्थेसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीला पुन्हा एकदा जबाबदार धरीत जोरदार टीका केली आहे. अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे. मात्र 27 गावांना सुविधा काही द्यायची नाही. या भागातील एकही रस्ता महापालिकेने केलेला नाही. आमदार निधीतून रस्ता करावा लागत आहे. भूमीपुत्रांची जागा आरक्षणासाठी घेतली जाते आणि गावकऱ्यांवर जादा मालमत्ता कर लावला जात आहे. हे अन्यायकारक आहे अशी टीका पाटील यांनी केली आहे.

27 गावे महापालिकेत आली मात्र एकही रस्ता महापालिकेने केला नाही

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पिसवली गावात माजी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात आमदार निधीतून रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. रस्त्याविषयी बोलताना राजू पाटील यांनी केडीएमसीवर जोरदार टिका केली. ज्या दिवसापासून 27 गावे महापालिकेत आली आहेत, एकही रस्ता महापालिकेकडून तयार करण्यात आलेला नाही. हा इतिहास आहे. केवळ रस्त्याची डागडुजी झाली. आता आमदार निधी किंवा दुसऱ्या हेडखाली रस्त्याचे काम केले जात आहे. अनधिकृत बांधकामातून अधिकारी पैसा ओरबाडत आहेत. 27 गावात सुविधा काही दिल्या जात नाही.

गावांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव

कल्याण डोंबिवली महानगरपालिका 27 गावांचा समावेश होऊन अनेक वर्ष झाली. मात्र या गावांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे गावात रस्ते नाही पाण्याची समस्या आहे. कचऱ्याची समस्या आहे. स्थानिक गावकरी सातत्याने याबाबत महापालिकेत तक्रार करतात मात्र गावकऱ्यांचा आरोप आहे की महापालिका या गावांकडे कधी लक्ष देत नाही. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे स्थानिकांच्या स्पष्ट आरोप आहे की महापालिका जाणून बुजून या गावांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करते. 27 गावातील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी वाढीव मालमत्ताकराच्या बिलाची होळी केली. याविषयी पाटील यांचे म्हणणे आहे की, 27 गावातील नागरिकांना जास्तीचा मालमत्ता कर आकारला जात आहे. भूमीपूत्रंची जागा घेऊन त्यावर आरक्षणे टाकली आहेत. गावांमध्ये ज्याप्रकारे कर लावले जात आहे ते अन्यायकारक आहे. (Criticism of MNS MLA holding Municipal Corporation responsible for bad condition of roads in rural areas)

इतर बातम्या

PNB ग्राहकांना धक्का! 1 डिसेंबरपासून खात्यात मोठा बदल करणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम

संजय राऊतांच्या घरी सनई-चौघडे, मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं राज्यपाल कोश्यारींना निमंत्रण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.