AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री दादा भुसे यांनी वाहतूक पोलिसांना का दिली तंबी?; म्हणाले, वाहतूक कोंडी…

काही ट्रक या महामार्गावरती उभे असलेले दिसून आले. मंत्री दादा भुसे यांनी या ट्रक चालकांना ट्रक उभा का केला, अशी विचारणा केली.

मंत्री दादा भुसे यांनी वाहतूक पोलिसांना का दिली तंबी?; म्हणाले, वाहतूक कोंडी...
| Edited By: | Updated on: Jul 31, 2023 | 8:38 PM
Share

ठाणे : ठाणे-नाशिक महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले. या ठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यात वाहतूक पोलीस रस्त्यावर मनमर्जीप्रमाणे कारवाई करतात. उभ्या रस्त्यावर मोठमोठे ट्रक थांबवतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या वाहतूक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी वाहन चालकाला तब्बल एक ते दीड तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागते. मात्र वाहतूक पोलिसांमुळे वाहतूक कोंडी होत असेल तर त्यांना जाब विचारणार तरी कोण ?

वाहतूक कोंडीत दादा भुसे अडकले

ठाणे-नाशिक महामार्गाची रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे ठाणे येथे कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी नाशिकवरून ठाण्याच्या दिशेने जात होते. मंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी दिसली. वाहतूक कोंडीत दादा भुसे यांना अडकावे लागले.

DADA BHUSE 2 N

वाहतूक पोलिसांनी काढल्या किल्ल्या

नेमकी ही वाहतूक कोंडी का झाली हे पाहण्यासाठी मंत्री दादा भुसे हे स्वत: आपल्या गाडीतून उतरले. दादा भुसे यांनी पाहणी केली. काही ट्रक या महामार्गावरती उभे असलेले दिसून आले. मंत्री दादा भुसे यांनी या ट्रक चालकांना ट्रक उभा का केला, अशी विचारणा केली. कारवाईसाठी पोलिसांनी या ट्रकच्या चाव्या काढून महामार्गावर उभ्या केल्या असल्याचे वाहन चालकांनी मंत्र्यांना सांगितले.

व्हिडीओ व्हायरल

मग काय वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंत्री दादा भुसे हे चांगलेच संतापले. स्वतःही वाहतूक कोंडी सोडवत वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांना कारवाई आम्हाला सांगू नका. रस्त्यावर ट्राफिक झाली नाही पाहिजे. ट्राफिक आम्हाला चालणार नाही, असे सांगत कानउघडणी केली. सध्या मंत्री दादा भुसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.