AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस सुरू होण्याआधीच अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मोठा अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?

आज रविवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालये बंद आहेत. त्यामुळे चाकरमानी आज घरीच होते. वर्किंग डेच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते.

पाऊस सुरू होण्याआधीच अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली, मोठा अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
mumbai localImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 18, 2023 | 10:49 AM
Share

अंबरनाथ : अजून म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक सरी पडत आहेत. अवघे काही मिनिटं तुरळ सरी पडतात आणि पाऊस गायब होतो. पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. तुरळक सरी पडत असल्याने कुठेही पाणी तुंबलेले नाही. असं असतानाही पाऊस सुरू होण्याआधीच मध्यरेल्वेची हाराकिरी सुरू झाली आहे. आज अंबरनाथ येथे लोकल रेल्वे रुळावरून घसरली आहे. सुदैवाने ही लोकल संपूर्ण खाली होती. शिवाय मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने लोकल सेवाही कमी करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळी 8.25 वाजता ही लोकल घसरली. ही लोकल रिकामी होती. लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. त्यामुळे कर्जतहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज मेगा ब्लॉक असल्याने रेल्वे गाड्यात कपात करण्यात आली आहे. तसेच ही लोकलही रिकामी होती. त्यामुळे मोठा अनर्थ ओढवला नाही. रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचं काम सुरू केलं आहे.

तर चाकरमान्यांचे हाल झाले असते

दरम्यान, आज रविवार असल्याने सरकारी आणि अनेक खासगी कार्यालये बंद आहेत. त्यामुळे चाकरमानी आज घरीच होते. वर्किंग डेच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते. आज जरी चाकरमानी घरी असले तरी अनेक लोक मुंबई किंवा कर्जतला जात असतात. त्यांना मात्र याचा फटका बसला आहे. रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पाऊस नसतानाही हाराकिरी

दरम्यान, पाऊस सुरू झाल्यावर रेल्वेला पहिल्या पावसाचा फटका बसतो. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे बंद पडत असते. मात्र, अजून पाऊस सुरूही झाला नाही तोच रेल्वे रुळावरून घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आताच रेल्वेची ही अवस्था आहे तर पाऊस सुरू झाल्यानंतर काय पाहावं लागेल अशा प्रतिक्रिया प्रवासांमधून उमटत आहेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार