AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये 350 घरांवर वन विभागाचा हातोडा, दीडशे घरं जमीनदोस्त, भाजप आमदार संतापताच कारवाईला स्थगिती

इतक्या लोकांना बेघर करण्याआधी लोकप्रतिनिधींची बैठक लावा, नंतर कारवाई करा, असे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी महिला वन अधिकाऱ्यास खडेबोल सुनावले (Forest department hammers 150 illegal houses in Kalyan).

कल्याणमध्ये 350 घरांवर वन विभागाचा हातोडा, दीडशे घरं जमीनदोस्त, भाजप आमदार संतापताच कारवाईला स्थगिती
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 24, 2020 | 6:41 PM
Share

ठाणे : कल्याणमध्ये वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या 350 घरांना हटवण्याची कारवाई सुरु असतानाच भाजप आमदार घटनास्थळी पोहचले. कोरोनाच्या काळात कारवाई कशाला? इतक्या लोकांना बेघर करण्याआधी लोकप्रतिनिधींची बैठक लावा, नंतर कारवाई करा, असे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी महिला वन अधिकाऱ्यास खडेबोल सुनावले. त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली (Forest department hammers 150 illegal houses in Kalyan).

कल्याण पूर्वेतील कचोरे गावात वन विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून लोक राहतात. या परिसरात 350 घरे बांधली गेली आहेत. ही घरे बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आज (24 डिसेंबर) वन विभागाच्या अधिकारी कल्पना वाघेरे यांच्या पुढाकाराने घरे तोडण्याची कारवाई सुरु झाली. दुपारपर्यंत जवळपास 150 घरे जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाईला स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी विरोध केला. कोरोनाच्या काळात आता तरी कारवाई करु नका, अशी त्यांची मागणी होती. या दरम्यान भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे त्याठिकाणी पोहचले. त्यांनी हा प्रकार पाहून प्रचंड संताप व्यक्त केला. कोरोना काळ सुरु आहे. इतके लोक बेघर झाले तर ते जाणार कुठे, राहणार कुठे? असा सवाल त्यांनी केला.

“स्थानिक लोक प्रतिनिधींशी चर्चा करुन कारवाई केली पाहीजे होती. बैठक लावा आणि पुनर्वसन आणि त्यानंतर विस्थापन असे केले पाहिजे होते. तसे नियोजन न करता ही कारवाई पूर्णपणे अयोग्य आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

याबाबत वन विभागाच्या अधिकारी कल्पना वाघेरे यांनी प्रतिक्रिया दिली. “कोरोनाच्या पूर्वीच सगळ्यांना नोटिसा दिल्या होत्या. अनधिकृतपणो वनविभागाच्या जागेवर कब्जा करण्यात आला आहे. त्यावर कारवाई सुरु आहे”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.