AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर; तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

तानसा हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक प्रमुख धरण आहे. आज या धरणातील पाण्याची पातळी 125.55 मी टिएचडीपर्यंत भरली आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी टिएचडी इतकी आहे.

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर; तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर; तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 21, 2021 | 12:26 AM
Share

शहापूर, सुनील घरत : मुंबईप्रमाणेच शेजारच्या ठाणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच आणखी एका धरणातील पाणीसाठ्याबाबत आनंदाची बातमी मिळणार आहे. पुढील अवघ्या 12 तानसा धरण भरून वाहू शकते. अर्थात हे धरण ओव्हरफ्लो होऊन वाहण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही ओसंडून वाहू लागला होता. मागील आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठा वाढू लागला आहे. विहार तलावापाठोपाठ आता तानसा धरणही काठोकाठ भरून वाहण्याच्या मार्गावर असल्यामुळे मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Great news for Mumbaikars; Tansa dam on the way to overflow)

तानसा हे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक प्रमुख धरण आहे. आज या धरणातील पाण्याची पातळी 125.55 मी टिएचडीपर्यंत भरली आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी टिएचडी इतकी आहे. त्यामुळे पुढील 12 तासांतच धरणातील पाणी ओसंडून वाहण्याची पातळी गाठू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तानसा धारण परिसर व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

सातही धरणाच्या पातळीत समाधानकारक वाढ

शहापूर तालुक्यातील तानसा गावात हे तानसा धरण आहे. तानसा धरणातून मुंबईला दररोज 450 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवणूक क्षमता साडेचौदा दशलक्ष लीटर इतकी आहे. मागील आठवडाभरापासून कोकणसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सर्व सातही धरणाच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांचा पुढील वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच महिन्यात दूर होऊ शकेल व पाणीटंचाईची चिंता दूर होईल, अशी शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस

जूनच्या अखेरीस थंड पडलेल्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांत ठाणे जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. शहरी भागांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडून टाकले आहे. अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. ठाणे शहरामध्ये एकूण पाऊस 1702.18 मिमी.च्या पुढे नोंद झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस जास्त आहे. गतवर्षी याचदरम्यान 1330.17 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. (Great news for Mumbaikars; Tansa dam on the way to overflow)

इतर बातम्या

7th Pay Commission News: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांची प्रतीक्षा संपली, सप्टेंबरपासून येणार वाढीव पगार

67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अद्यापही संसर्गाचा धोका, चौथ्या सिरो सर्वेत दावा

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....