AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराच्या पाण्याचा फटका, तडे गेल्यामुळे कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद, पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय

पुराच्या पाण्यामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे गेले आहेत. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पुराच्या पाण्याचा फटका, तडे गेल्यामुळे कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद, पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय
KALYAN BRIDGE
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 10:36 AM
Share

ठाणे : पुराच्या पाण्यामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे गेले आहेत. याच कारणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पुलावरील सर्व वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवली आहे. तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी सुरु करायचा की नाही, याबबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. (Kalyan Gandhari bridge broken due flood bridge is been closed as precautionary measure)

पाऊस आणि पुरामुळे कल्याण-गांधारी पुलाला तडे

मागील काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानीबरोबरच रस्ते, पूल उखळून पडले आहेत. याच पाऊस आणि पुरामुळे कल्याण-गांधारी पुलाची नासधूस झाली आहे. पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या या पुलाचा वापर भिवंडी, पडघ्याच्या दिशेने जाण्यासाठी होतो.

पुलावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली

कल्याण-गांधारी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या भागात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चाकरमान्यांना त्यांच्या घरी जाण्यास उशीर होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेता सुरक्षिततेसाठी पुलावरील वाहतूक बंद करत या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पीडब्ल्यूडीकडून या पुलाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर या पुलाबाबत निर्णय होणार आहे.

इतर बातम्या :

Assam Mizoram Border Dispute: आसाम मिझोरम सीमा संघर्ष, मराठमोळे पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी, पायात गोळी लागली, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू

जनतेचा आक्रोश समजून घ्या, अंगावर धावून जाणं योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना फटकारलं

अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

(Kalyan Gandhari bridge broken due flood bridge is been closed as precautionary measure)

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.