AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत”; मनसे का झाली आहे आक्रमक…

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत; मनसे का झाली आहे आक्रमक...
| Updated on: Jun 13, 2023 | 7:00 PM
Share

मीरा-भाईंदर : सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असल्याने वेगवेगळ्या मुद्यांवर जोरदार चर्चा सुरु आहे. कधी विकासाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघत असतं तर कधी युती-आघाडीवरून राजकारण तापलेले असते. सध्या मीरा-भाईंदरचेही वातावरण प्रचंड तापले आहे. कारण कधी काळी मनसेकडून एकनाथ शिंदे यांच्याविषयी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने त्यांच्याविषयी च्रचा करण्यात आली होती. तर आता त्याच मनसेकडून शिंदे सरकारच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये अनेक गुन्हे घडूनसुद्धा पालकमंत्री व प्रशासन झोपले आहे का हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे असा सवाल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सरकारला करण्यात आला आहे. त्यामुळे आता मीरा-भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविरोधात बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावर नागरिक नाराज असल्याचे म्हणत पालकमंत्र्यांचे याकडे का लक्ष नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मीरी-भाईंदर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्याकडे प्रशासनाने का दुर्लक्ष केले आहे असा सवाल करत वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण सरकारच्या लक्षात येत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे तसेच आपण यांना पाहिलात का असाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

पालक मंत्री शंभूराज देसाई मीरा भाईंदर शहरात येत नसल्याने मनसे सैनिकांमध्ये नाराजगी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मीरा भाईंदरकडे दुर्लक्षे केले असल्याने मनसे कार्यालयाबाहेर पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

त्यांच्या फोटोसह आणि नावाने जोरदार बॅनरबाजी केली गेल्याने आता सरकारच्या कामावरही नागरिक नाराजी व्यक्त करत असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.