AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना पसंदी असेल तर भाजपने त्यांचेच ऐकावे”; राष्ट्रवादीनं भाजप-शिवसेनेच्या जागांवरून टोला हाणला

शिंदे आणि फडणवीस सरकारकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंदी असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या जाहिराती आज सगळीकडेच झळकल्या आहेत.

सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना पसंदी असेल तर भाजपने त्यांचेच ऐकावे; राष्ट्रवादीनं भाजप-शिवसेनेच्या जागांवरून टोला हाणला
| Updated on: Jun 13, 2023 | 5:24 PM
Share

सांगली : आगामी काळातील निवडणुकांसाठी आता राष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षांनीही आता चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चेना उधान आले आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपापल्या हक्काच्या जागांवर दावा करत मित्र पक्षासह विरोधकांच्या मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राजकीय सर्व्हेनुसारही आता दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. जो सर्व्हे केला गेला आहे, त्या सर्व्हेमध्ये जर एकनाथ शिंदे यांच्या बाजून सर्व्हे आला असेल तर भाजपने विचारपूर्वक निर्णय घेऊन, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला हवे असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर सर्व्हे आला असेल तर भाजपनेही त्यांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे. तसेच ते ज्या जागांवर दावा करत असतीर त्या जागा त्यांना दिल्या पाहिजेत असं मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंदी असेल,तर भाजपाने त्यांचे ऐकावे,आणि शिंदेंना भाजपाने पूर्ण नेतृत्व द्यावं असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यांच्या पक्षाने 70 ,80,90 जागा मागितली आहेत, त्यांना तेवढ्या द्याव्यात,अशी आमची उपसूचना असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंदी असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या जाहिराती आज सगळीकडेच झळकल्या आहेत.

त्यावरून जयंत पाटील यांनी हा टोला लागावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावताना म्हटले आहे, एकनाथ शिंदे यांना सर्व्हेमध्ये जर जास्त पसंदी असेल तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून ते भाजपनेही मान्य केले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.