AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: ठाणेकरांची मिटली चिंता, बारवी धारण 100% भरले

बारवी धरण भरण्यास अवघा दीड टक्‍के पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहे. धरणावर स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडले जातील. यामुळे धरण परिसर, नदीकाठची गावे व अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Thane: ठाणेकरांची मिटली चिंता, बारवी धारण 100% भरले
बारवी धरण Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 12, 2022 | 1:54 PM
Share

Thane, दोन दिवसांत बारवी धरण (Barvi Dam) व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेने (Capacity) भरले. त्यामुळे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.  धरणातील पाणीसाठ्यात 7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 11 ऑगस्टला बारवी धरणात 334.19 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 98.63 टक्के पाणीसाठा होता. सायंकाळच्या सुमारास हे धरण 100 टकके क्षमतेने भरले असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. धरण परिसरात शून्य मिमी पावसाची नोंद होत होती. यामुळे बारवी पूर्ण क्षमतेने भरण्यास विलंब होण्याची चर्चा सुरू होती, मात्र गेल्या पाच दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

पाण्याचे नियोजन महत्त्वाचे

30 जुले ते 5 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणीसाठा हा 86 टक्क्यांवर स्थिरावला होता. धरण परिसरात 0 मिमी पावसाची नोंद त्यादरम्यान झाली होती. 7 तारखेपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. चांगला पाऊस पडल्याने 9 तारखेला पाणीसाठा हा 91 टक्क्यांवर पोहोचला. दोन दिवसांत धरण परिसरात सरासरी अनुक्रमे 87 व 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणतील पाणीसाठा आजच्या शंभर टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या वर्षीचे पाण्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.

सतर्कतेचा इशारा

बारवी धरण भरण्यास अवघा दीड टक्‍के पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहे. धरणावर स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडले जातील. यामुळे धरण परिसर, नदीकाठची गावे व अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील वर्षापिक्षा 16 टक्के अधिक पाणीसाठा

11 ऑगस्ट 2021 ला बारवी धरणा 278.64 दठालक्ष घनमीटर म्हणजे 82.23 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी 2022 मध्ये 19 ऑगस्टला धरणात 334.19 दलक्ष घनमीटर म्हणजेच 98.63 टक्‍के पाणीसाठा आहे. मागील वर्षीपेक्षा 16 टाक्यांनी यंदा पाणीसाठा जास्त आहे.

ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.