AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष

राबोडी येथील खत्री अपार्टमेंटचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. मात्र, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेला इमारतीतील रहिवाश्यांनाच जबाबदार धरलं आहे. (thane corporation clarification on rabodi building slab collapse)

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष
eknath shinde
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 4:55 PM
Share

ठाणे: राबोडी येथील खत्री अपार्टमेंटचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. मात्र, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेला इमारतीतील रहिवाश्यांनाच जबाबदार धरलं आहे. रहिवाश्यांना वारंवार सूचना देवून तसेच इमारत धोकादायक घोषित करून देखील रहिवाशांनी दुर्लक्ष केल्याने आजची दुर्देवी घटना घडल्याचा खुलासा ठाणे महापालिकेने केला आहे. दरम्यान राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. (thane corporation clarification on rabodi building slab collapse)

ठाणे महापालिकेच्यावतीने राबोडी येथील खत्री इमारत धोकादायक म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे. सदरच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देवून देखील त्यांनी इमारत खाली केली नव्हती. याबाबत महापालिकेच्यावतीने इमारत दुरुस्तीची नोटीस बजावून, त्याचे स्मरणपत्र देण्यात आले आहे. परंतु रहिवाशांनी प्रतिसाद न दिल्याने दुर्दैवाने आजची घटना घडली आहे. घटनेनंतर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार, उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पथकाच्या माध्यमातून सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करत इमारत पुर्णपणे खाली करून सील करण्यात आली आहे.

नोटिसा बजावण्यात आल्या होत्या

आज पहाटे 6 वाजता राबोडी येथील खत्री अपार्टमेंट या इमारतीच्या सी-विंग च्या तिसऱ्या मजल्याचे फ्लोरिंग, दुसऱ्या व पहिल्या मजल्याचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. खत्री अपार्टमेंट या इमारतीची 2013 साली पाहणी करून सदर इमारतीस धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. महाराष्ट्र महापालिका अधिनियमचे कलम 264 (1) (2) (3) (4) अन्वये या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावण्यात आली होती. सदर नोटिसच्या विहित मुदतीनंतरही भोगवटधारकांनी इमारत रिक्त न केल्याने कलम 268 (सी-1) अन्वये संबंधितांना नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतरही संबंधितांनी इमारत रिक्त न केल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 268(5) अन्वये राबोडी पोलिस स्थानक यांना इमारत रिक्त करून देणेबाबत पालिकेकडून पत्र देण्यात आले होते.

वीज, पाणी कापण्याचीही नोटीस

या इमारतीस ठाणे महापालिकेने पुरविलेल्या सर्व सेवा खंडित करण्याबाबत कार्यकारी अभियंता, (पाणी पुरवठा) कार्यकारी अभियंता, (विद्युत) कार्यकारी अभियंता, (ड्रेनेज) यांना पत्र देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत संबंधितांना पत्र देण्यात आले होते. तसेच ही इमारत सी – 2– बी या वर्गवारीत असल्याचा अहवाल महापालिकेच्या तालिकेवरील स्ट्रक्चरल ऑडिटर मे.सेंटरटेक यांनी सादर केलेला असून त्यामध्ये ही इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी असे नमूद करण्यात आले होते, असं ठाणे पालिकेने म्हटलं आहे.

तीन वेळी स्मरणपत्रं पाठवले

त्यानंतर या इमारतीच्या भोगवटधारकांना आजतागायत तीन वेळा इमारतीच्या दुरुस्तीबाबत स्मरणपत्र देण्यात आली होती. त्यामध्ये इमारत तातडीने रिक्त करून दुरुस्त करावी तसे न केल्यास काही जीवित व वित्त हानी झाल्यास झालेल्या दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही पालिकेकडून नमूद करण्यात आलेले होते.

इमारत रिकामी केली नाही त्यामुळे दुर्घटना

दरम्यान, इमारतीची काही अंशी दुरुस्ती करण्यात आली. इमारतीचे 85 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, उरलेले 15 टक्के काम तातडीने दुरुस्त करा, तसे न केल्यास काही दुर्घटना घडल्यास त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार नाही असेही पत्र मे. सेंटरटेक यांनी संबंधितांना दिलेले होते. मात्र त्यालाही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सदरची इमारत पूर्ण रिकामी करुन काम करण्यात आली नसल्याने आज दुर्दैवाने दुर्घटना घडली आहे. घटनेनंतर उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पथकामार्फत आज सुरक्षितेच्यादृष्टीने सदरची इमारत तात्काळ खाली करून सील करण्यात आली आहे. (thane corporation clarification on rabodi building slab collapse)

संबंधित बातम्या:

भल्या पहाटे काळाचा घाला, ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

उल्हासनगर स्टेशनपरिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी

(thane corporation clarification on rabodi building slab collapse)

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस