AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime: कल्याणमधील ‘त्या’ जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू, मुलावर खूनाचा गुन्हा दाखल

प्रमोद आणि त्यांचा मुलगा लोकेश यांच्यात सतत वाद होत असत. असाच वाद त्यांच्यात 10 डिसेंबर रोजी झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली.

Kalyan Crime: कल्याणमधील 'त्या' जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू, मुलावर खूनाचा गुन्हा दाखल
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 1:08 AM
Share

कल्याण : कल्याणच्या चिकनघर परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचा अखेर उपाचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिच्या जखमी मुलावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरगुती वादातून मुलाने वडिलांवर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली होती. यावेळी मध्ये पडलेल्या आईवरही त्याने हल्ला करुन जखमी केले होते. तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने स्वतःलाही जखमी केले होते. यानंतर त्याने वडिलांनी आई व आपल्यावर हल्ला करुन स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव मुलाने केला होता.

पोलिसांनी जखमी आई व मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आईचा जबाब घेतला असता मुलाने हे सर्व घडवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुलावर वडिलांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमी आईचाही शनिवारी मृत्यू झाल्याने आता महात्मा फुले पोलिसांनी आईच्या खुनाचा गुन्हा मुलगा लोकेश याच्यावर दाखल केला आहे.

10 डिसेंबर रोजी कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत घडली होती घटना

कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात एका हाय प्रोफाईल इमारतीत प्रमोद बनोरिया हे निवृत्त मोटरमन आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. प्रमोद आणि त्यांचा मुलगा लोकेश यांच्यात सतत वाद होत असत. असाच वाद त्यांच्यात 10 डिसेंबर रोजी झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. यावेळी प्रमोद यांच्या पत्नी कुसुम त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडल्या असता लोकेशने त्यांच्यावरही चाकून 8-10 वार केले होते. या हल्ल्यात कुसुम गंभीर जखमी झाल्या होत्या.

स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकेशने स्वतःला जखमी केले आणि वडिलांनीच आपल्यावर हल्ला केल्याचा बनाव केला होता. लोकेशने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला अॅम्बुलन्सला बोलावण्यास सांगितल्याने त्याला संशय आला. सुरक्षारक्षकाने सोसायटीतील लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार सोसायटीतील लोक बनोरिया यांच्या घरी आले असता त्यांना घरातील सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. लोकांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच कुसुम आणि लोकेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (The injured woman from Kalyan died during treatment)

इतर बातम्या

Jaipur Crime: विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीहून जयपूरला आलेल्या प्रियकराला चाकूने भोसकले

Anil Deshmukh: चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड, मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करण्याचे आदेश

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.