AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रासायनिक प्रवाहामुळे या नदीत हजारो माशांचा मृत्यू ?

सध्या तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली आहे. त्याचबरोबर काही लोकं पाण्यात उतरून माशांची पाहणी करीत आहे. तर काही तडफडत असलेले मासे नागरिक पकडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रासायनिक प्रवाहामुळे या नदीत हजारो माशांचा मृत्यू ?
SANGLI FISH DEATHImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 10, 2023 | 2:13 PM
Share

शंकर देवकुळे, सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातून जात असलेल्या कृष्णा नदीला (krishna river) प्रदुषणाचा विळखा कायम असल्याची तक्रार नागरिक करीत असतात. या गोष्टीला कारखाने आणि नागरिक जबाबदार असल्याची ओरड नागरिक नेहमी करीत असतात. कृष्णा नदीत विविध पद्धतीचे मासे आहेत. अनेकदा कृष्णा नदीत मासे मृत्यूमुखी (fish death) पडल्याचे पाहायला मिळते. कित्येकदा अशा पद्धतीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सध्या कृष्णा नदीत मेलेल्या माशांचा खच दिसून येत आहे. ही बातमी वाऱ्यासारखी सगळी पसरली आहे. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी अधिक गर्दी केली आहे. हा नेमका प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली

कृष्णा नदीमध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, धक्कादायक प्रकार कृष्णा नदीकाठी घडल्याने सांगलीकरांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे. गेले काही दिवस कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित दूषित पाणी येत आहे असं सांगलीकरांनी वारंवार सांगत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले

या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. भविष्यात या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही फार मोठा परिणाम होणार आहे. नागरिकांनी या आगोदर सुध्दा वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु कसल्याची प्रकारची दखल घेतली नसल्याचं नागरिक सांगत आहेत.

सध्या तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली आहे. त्याचबरोबर काही लोकं पाण्यात उतरून माशांची पाहणी करीत आहे. तर काही तडफडत असलेले मासे नागरिक पकडत असल्याचं पाहायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.

अशा पद्धतीच्या घटना कोल्हापूरमधील पंचगंगा नदीत सुध्दा घडल्या आहेत. अनेकदा विषाणु पदार्थ पाण्यात मिसळल्याने माशांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल