AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेळताना अंघोळीची इच्छा झाली, अंगाची लाहीलाही थांबवण्यासाठी डबक्यात उतरले अन् तेवढ्यात… 3 चिमुरड्यांसोबत काय घडलं?

अक्कलकुवा तालुक्यातील जामठी परिसरात अंघोळीसाठी गेलेल्या तीन आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

खेळताना अंघोळीची इच्छा झाली, अंगाची लाहीलाही थांबवण्यासाठी डबक्यात उतरले अन् तेवढ्यात...  3 चिमुरड्यांसोबत काय घडलं?
फोटो प्रातिनिधक
| Updated on: Jun 10, 2026 | 8:32 AM
Share

नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम जामठी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नदीकाठावरील पाण्याने भरलेल्या डबक्यात अंघोळीसाठी गेलेल्या तीन निष्पाप आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जामठी परिसरासह अक्कलकुवा तालुक्यावर शोककळा पसरली असून, आदिवासी बांधवांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, जामठी परिसरातील ही तीन लहान मुले दुपारी नदीकाठच्या परिसरात गेली होती. या ठिकाणी नदीजवळच पाण्याने भरलेले एक मोठे डबके होते. कडक उन्हाळा असल्याने आधीच अंगाची लाहीलाही होत होती. त्यामुळे अंघोळीचा आनंद घेण्यासाठी ही तिन्ही मुले त्या डबक्यात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ही तिन्ही निष्पाप बालके पाण्यात बुडू लागली. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही पाण्यात बुडून अंत झाला.

ग्रामस्थांची धाव, पण वेळ निघून गेली होती

मुले बऱ्याच वेळापासून घरी न परतल्याने स्थानिक नागरिकांनी नदीकाठाकडे धाव घेतली. यावेळी डबक्याजवळ मुलांचे कपडे व इतर साहित्य पाहून ग्रामस्थांनी तातडीने पाण्यात शोधमोहीम सुरू केली. मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही बालकांना पाण्याबाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मृत बालकांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुरक्षा उपाययोजनांचा अभाव; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाविरोधी नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. नदीकाठच्या अशा धोकादायक डबक्यांवर किंवा उत्खनन झालेल्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा उपाययोजना किंवा धोक्याचे फलक लावण्यात आले नव्हते. प्रशासनाच्या आणि संबंधित कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच तीन निष्पाप बालकांचे बळी गेले आहेत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

मदत आणि सुरक्षेची मागणी

या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र दुःख व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबे अत्यंत गरीब आणि दुर्गम भागातील असल्याने शासनाने त्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने परिसरातील धोकादायक पाण्याचे साठे, डबके बुजवावेत किंवा त्याभोवती तात्पुरती तटबंदी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली