AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik accident: नाशिक जिल्ह्यात कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Nashik News- या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik accident: नाशिक जिल्ह्यात कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 7:00 PM
Share

नाशिकनाशिक जिल्ह्यात (Nashik Accident) कळवण तालुक्यात मुळाने बारीजवळ भीषण अपघात (Car and Tractor Accident) झाला आहे.  ट्रॅक्टर एका कारवर कलंडून झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू (Accident Death) झाल्याची अधिकृत माहिती असून, एकूण अपघातात सात जण मृत झाल्याचे सांगण्यात  येते आहे. यात काही जण जखमीही झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या डोंगराजवळ मार्कंडेय डोंगराच्या जवळ असलेल्या मुळाणे बारी येथील ही घटना आहे. या अपघातात ट्रॅक्टर कारवर कलंडली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचे काही भयानक फोटोही समोर आले आहेत. जे पाहून कुणाचेही काळीज करपेल.

जखमींना तातडीने रुग्णालयात नेलं

जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा या अपघातात आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात मोठा भीषण होता, ट्रॅक्टर कारवर कलंडल्याने, कार पूर्णपणे ट्रॅक्टरखाली अडकल्याचे अपघाताच्या फोटोंमध्ये दिसते आहे.

अपघाताचे भीषण फोटो

वाहनांचाही चेंदामेंदा

या अपघाताचे फोटो पाहिल्यास या वाहनांची अवस्था पाहून या अपघाताची दाहकता लक्षात येते. या अपघातात या दोन्ही वाहनांचा अगदी चेंदामेंदा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाढऱ्या रंगाची ही पूर्ण ट्रॉलीच्या खाली दबली आहे. या गाडीचा नंबरही या फोटोतून सहज दिसत आहे. MH 41 AZ 1005 असा या पांढऱ्या कारचा नंबर आहे. मात्र या ट्रॅक्टरचा नंबर या फोटोतून दिसून येत नाही.

गेल्या काही दिवसांपासून अपघातात वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मळते आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यानेही अनेक जण प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.