
राज्यातील मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका उशीरा होण्याची शक्यता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. दादर येथील शिवसेना भवनासमोर भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत बॅनर वॉर रंगले आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तर निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यात पारा घसरला असून अनेक शहरं आणि गावं गारठली आहेत. तर महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी उद्यापासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचा.
नागपुरच्या त्रीमुर्ती नगर परिसरातील बारमध्ये तोडफोड, व्हिडीओ व्हायरल
उर्वशी बारमध्ये पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने तोडफोड झाल्याची चर्चा
प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
चार चे पाच जणांनी तोडफोड केल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल
प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती
बीडच्या मांजरसुंबा घाटात धुळे-सोलापूर महामार्गावर 5 वाजता डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला कंटेनरची धडक बसल्याने टँकर पलटी होऊन भिषण स्फोट झाला. या स्फोटानंतर घाटामध्ये आग लागल्याने तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आता राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिकांना स्ट्रूाँग रूम मधील सर्व चित्रीकरण 24 तास पाहता येणार आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आलं असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सर्व चित्रीकरण पाहता येणार आहे. यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर होऊन पारदर्शकता येईल अशी प्रतिक्रिया अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.
कल्याण पश्चिम गोविंदवाडी बायपास परिसरात भीषण अपघात झाला आहे. पत्री पूल–दुर्गाडी गोविंदवाडी रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे एकाच मार्गावरून वाहतूक सुरू असताना ट्रक आणि एक्टिवाची जोरदार धडक झाली. या अपघातात एक्टिवा चालक प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत.
बदलापूर जवळच्या आंबेशीव गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास एका बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच या भागात एक नव्हे तर दोन बिबटे असल्याचीही माहिती समोर आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबेशीव गावात स्थानिकांना बिबट्या दिसल्यामुळे इथले नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याची माहिती मिळताच वनविभागाने याठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवत तातडीच्या उपायोजनाही सुरू केल्या होत्या. मात्र बिबट्याला पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आलेलं नाही.
नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. शिर्डी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सावळीविहीर ते शिर्डी दरम्यान महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
बीडच्या मांजरसुंबा घाटात धुळे सोलापूर महामार्गावर दीड तासापासून आगीचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर दीड तासापूर्वी पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला. गेल्या दीड तासांपासून आग आटोक्यात येत नाही. त्यामुळे आता काही वेळापूर्वी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
नागपुरात मराठी शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी संघटना एकवटल्या आहेत. विद्यार्थी संघटनांकडून मराठी शाळा वाचवण्यासाठी आंदोलन केलं जात आहे. मराठी शाळा वाचवा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
मध्ये रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकाबाहेर कारवाई केल्याच्या रागातून फेरीवाल्यांनी आरपीएफ अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. साध्या वेशातील आरपीएफ अधिकाऱ्यांनी रेल्वे परिसरात असणाऱ्या हॉकर्सवर कारवाई केली. या दरम्यान फेरीवाल्यांनी आर पी एफ च्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हीडिओ मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी घडल्याचं म्हटलं जात आहे. या संदर्भात मुंब्रा रेल्वे आरपीएफ या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 5 जणांना ताब्यात घेतलंय. तर इतर हॉकर्स फरार आहेत.
बीडच्या मांजरसुंबा घाटात धुळे सोलापूर महामार्गावर पेट्रोल-डिझेलची वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. त्यानंतर एका कंटेनरची धडक झाल्यानंतर अचानक टँकरचा स्फोट झाला. सुदैवाने स्फोट होताच टँकरमधून चालक-क्लिनर सुखरूप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. सध्या रस्त्यावर आगीचे लोट उठलेले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सरकारने 2027 च्या जनगणनेसाठी 11718 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. कोळसा लिंकिंग धोरणात मोठ्या सुधारणा करण्यासाठी CoalSETU ला मान्यता देण्यात आली. 2026 च्या कोप्रा एमएसपी धोरणाला मंजुरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. याचा फायदा नारळ उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
इंडिगोने ऑपरेशनल बिघाडाची चौकशी करण्यासाठी एक तज्ज्ञ पथक नियुक्त केले आहे. इंडिगोच्या बोर्डाने मुख्य विमान वाहतूक सल्लागार एलएलसी यांना चौकशी करण्याचे काम सोपवले आहे. या पथकाचे नेतृत्व कॅप्टन जॉन इल्सन करतील. त्यांना एफएए, आयसीएओ, आयएटीए आणि अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमध्ये काम करण्याचा 40 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. ही पथक अलिकडच्या ऑपरेशनल बिघाडाच्या कारणांची स्वतंत्र आणि तज्ज्ञ चौकशी करेल.
लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी सीबीआयचे एक पथक थायलंडला रवाना होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या पथकाने थायलंडऐवजी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. सीबीआय अधिकारी लुथरा बंधूंना दिल्लीला घेऊन येतील आणि त्यानंतर गोवा पोलिस त्यांना दिल्लीतून अटक करून आणतील.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. बीएसएफने एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. दोन दिवसांच्या कारवाईत बीएसएफला मोठे यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेला संशयित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाला भारतात घुसवण्याची योजना आखत होता.
छत्रपती संभाजीनगर नगर पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या आणि विकणाऱ्या विरुद्ध कंबर कसली आहे. ड्रोनच्या स्पीकरद्वारे पोलीस नायलॉन मांजा संदर्भात सूचना देणार आहेत. नायलॉन मांजा कुणाकडे आढळून आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस कारवाई करणार आहेत. गेल्या काही दिवसात नायलॉन मांजामुळे 3 वर्षांच्या चिमुकलीसह अनेक नागरिकांचे गळे चिरून ते गंभीर जखमी झाले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने तपोवन वृक्षतोडीबाबत दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाचे पर्यावरण प्रेमींकडून स्वागत करण्यात आले आहेत. नाशिककरांची बाजू मांडल्याबद्दल याचिकाकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.लवादाच्या या निर्णयामुळे प्रशासनाला आता उत्तर द्यावं लागणार आहे. लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.
जालन्याच्या नाफेड हमीभाव केंद्राकडून मागील आठवडाभरात 4 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.खासगी बाजारापेक्षा चांगला दर मिळत असल्याने हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा ओढा सुरु झाला आहे.सोयाबीनची रोज जवळपास 600 ते 700 क्विंटल आवक होत आहे.
परभणीच्या सेलू स्ट्राँग रूमवर काँग्रेसचे पदाधिकारी 24 तास बसून पहारा देत आहेत. सेलू नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत आहे. तहसील कार्यालयात स्ट्राँग रूम उभारण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजपकडून इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वाटप सुरु झाले आहे. इच्छुक उमेदवारांची गर्दी केली होती. जालना महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भास्कर दानवे यांनी व्यक्त केला आहे.
मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाला मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. अधिग्रहण प्रक्रिया पारदर्शक नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, शेतीला मिळणारा मोबदला कवडीमोल, पंचनाम्यात त्रुटी व मूळ जमीन मूल्यांकनात तफावत, प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाचा विचारच न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे आरोप
भाजप आमदार सुरेश धस यांची समाज माध्यमाद्वारे बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी धस समर्थक आक्रमक झाले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शेकडो समर्थकांनी पोलीस अधिक्षक यांना निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांचे सूचक ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. देशपांडे यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठेकेदारांची होत असलेली गर्दी दाखवणारा व्हिडीओ पोस्ट करत टोला लगावला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांना आयुक्त वेळ देत नाहीत… मात्र ठेकेदार भेटतात कसे? असा थेट सवाल देशपांडेंनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. खासदार संदिपान भुमरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्मचे वाटप करण्यात आलेले आहे.त्यात इच्छुक उमेदवारांची सगळी माहिती एकत्रित करून सोमवारी त्यावर मुलाखती होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली होती.
गडचिरोलीतील जीमलगट्टा भागात वाघाची दहशत पाहायला मिळाली. वाघाने एकाच दिवसात जवळपास ३१ बकऱ्यांची शिकार केली आहे. बकऱ्यांचा कळप घेऊन चरण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुराखीने पळ काढल्यामुळे तिथे असलेल्या बकऱ्यांची शिकार वाघाने केली आणि 31 बकरे ठार मारले.
रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन तास बैठक झाली. सर्व मलापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असून मुंबई आणि ठाण्यात 100 टक्के युती करण्याचा निर्णय असल्याची चव्हाणांनी माहिती दिली आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. धमकीनंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हीसीद्वारे उपस्थित असणार आहेत. आरोप निश्चितीबाबत वकिलांचा अडीच तास युक्तीवाद झाला. आरोपीच्या वकीलांनी “वेळ द्या, चार्ज फ्रेम करू नका, शेवटची संधी द्या” अशी विनंती केली आहे.
नागपुरात काँग्रेसच्या NSUI संघटनेने मोर्चा काढला आहे. रोजगाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झालं आहे. संघटनेनं विधानभवनावर मोर्चा काढला. पोलिसांचा या मोर्चाला अडवून धरण्याचा प्रयत्न सुरु
मुंबईच्या पवईतील आयआयटीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच अनावरण. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण.
संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी दुपारी तीन वाजता पुन्हा सुरू होणार. आरोप निश्चित करण्यासंदर्भात तब्बल अडीच तास युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम व्हीसीद्वारे उपस्थित होते. आरोपींचे चार वकील देखील उपस्थित होते. आम्हाला वेळ द्यावा चार्ज फ्रेम करू नये, आम्हाला शेवटची संधी द्यावी. हायकोर्टात अर्ज केला आहे, असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं.
ऊसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती समिती आक्रमक झाली आहे. दरम्यान आज माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील पांडुरंग कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र केले.
कळवा रेल्वे स्थानकावर अनधिकृत फेरीवाल्यांनी जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांना क्रूरपणे मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जीआरपी आणि आरपीएफ कर्मचारी कळवा स्थानकावर बेकायदेशीर पणे काम करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत होते आणि त्यांचे तराजू आणि इतर वस्तू जप्त करत होते. फेरीवाले संतप्त झाले आणि जीआरपी आणि आरपीएफ कर्मचारी गणवेश नसतानाही उपस्थित होते. ज्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले.
ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे ३३०० बेडचे बांधकाम सुरू होणार आहे. या नवीन बांधकामासाठी एकूण १६१४ झाडांपैकी ७०० हून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा अंदाज आहे. मनसेने या प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या तपोवननंतर ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होऊ नये, यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आवाज उचलला आहे.
देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी वन्य प्राण्यांच्या वाढत्या समस्येकडे वेधले. त्यांच्या बंदोबस्तासाठी ‘बोमा टेक्निक’ चा अवलंब करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे पिकांचे होणारे मोठे नुकसान आणि रानडुक्कर, निलगाय, रोही यांच्या त्रासामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सभागृहातील जंगलात शेळ्या-मेंढ्या सोडा यांसारख्या उपायांचा उल्लेख करत, यावर प्रभावी पर्याय म्हणून मध्यप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही बोमा तंत्रज्ञान वापरण्याची मागणी केली.
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २६ गावांमधील पाण्याचे स्रोत दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात १७५२ जलस्रोतांच्या नमुन्यांची, तर शहरी भागात ६१४ नमुन्यांची तपासणी केली असता, हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
पंकजा मुंडे यांनी यावेळी मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांच्या आठवणी खूप आहेत, मात्र आमच्यापेक्षा जनतेसोबत ते जास्त असायचे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने दु:ख व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ते देशपातळीवर नाव कमावलेले नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांची कमी लोकांना नक्कीच भासणार आहे. एक चांगले नेतृत्व गमावल्याची खंत यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांच्या लोकांसाठी जगले. ते असे नेते आहेत, ज्यांची लोकप्रियता आज देखील वाढत आहे. आज देखील लोक मला त्यांची मुलगी आहे म्हणूनच ओळखतात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. “आता माझे बाबा माझे नाही राहिले, तर ते सर्वांचे झाले आहेत.” आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करायचो; मात्र त्यांची जयंती कधी करू असे कधी वाटले नव्हते, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.
पुण्यातील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या मालिकेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आज तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान नागरिकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. या धोकादायक भागातील अपघातांवर केवळ तात्पुरते नव्हे, तर कायमस्वरूपी तोडगा काढावा जेणेकरून भविष्यातील जीवितहानी टाळता येईल, अशी मागणी केली जात आहे.
IG ऑफिस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. पहाटेच्या सुमारास नाशिकच्या गडकरी चौकात असलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर दिसून आला. ig ऑफिस मध्ये बिबट्या दिसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांसह वनविभागाची धावपळ सुरु झाली.
राज्यात 15 लाख लोकांना रोजगार मिळणार…राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीत मोठा करार… मायक्रोसॉफ्टसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मंख्यमंत्र्यांनी दिली… फेडएक्स कंपनीशी GCC बाबात चर्चा झाली… सत्या नडेलांसोबत देखील चर्चा झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावातील घटना आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावातील मनाजी सुपेकर यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा संचार पाहायला मिळेत आहे. वनविभागाचे पथक थोड्याच वेळेत घटनास्थळी दाखल होणार असून विहिरीत पाणी असल्याने बिबट्याची देखील प्राण वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे.
महायुतीच्या तीन तिघाडा काम बिघाडावर बोलायचं नाही… लोत महायुती सरकारला घरी पाठवण्याची तयारी करतील… महायुती एकत्र लढेल की नाही ते येणारा काळ सांगेल… असं वक्तव्य देखील पटोले यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी महाजन ठाकरेंवर बोलतात… असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलं आहे. एवढंच नाही तर, महाजनांना सत्तेचा माज, तुम्ही काय होता आणि आज काय झालात… असं देखील अहिर म्हणाले.
शिर्डी – साकुरी शिवेवर बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मानवी वस्तीजवळ बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे…
डोक्यावरची टोपी काढण्याचा क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांचा वाद चिघळल्याचा प्रकार समोर आला आहे. गरोदर महिलेला पोटावर लाथा मारत जीवघेणा हल्ला केल्यामुळे पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
ठाणे शहरात आणखी चार दिवस 50 टक्के पाणी कपात होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
पाणी कपातीवरून सत्ताधारी मधील भाजप पक्षाने कळवा शहर येथे आंदोलन केलं होतं. तर ठाकरे गट ,मनसे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विरोधकांनी देखील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं.
राज्यात विविध भागात बिबट्याच्या संचारामुळे दहशतीचं वातावरण असतानाच आता शिर्डी – साकुरी शिवेवर बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं. मानवी वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने नागरिक मात्र चांगलेच घाबरले आहेत. वन विभागाने लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटलं असून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे एकूण 32 टायर फोड. त्यामुळे ऊस वाहतूक ठेकेदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे. वाखरी येथे रात्री शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर फोडून ऊस वाहतूक रोखली. गेल्या 5 दिवसांपासून पंढरपुरात ऊस आंदोलन सुरू आहे.
पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाख रुपयांचा गांजा जप्त, बँकॉक ते पुणे या विमानाने आलेल्या महिलेने चिप्सच्या डब्यात 722 ग्रॅम गांजा लपवला होता. अखेर पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने कारवाई करून त्या महिलेला अटक केली आणि लाखोंचा गांजा जप्त केला.
मुंबई सर्वात नीचांकी थंडी.थंडीने मुंबई गारठली. यंदाचे सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले. झपाट्याने थंडीमध्ये वाढ झालीये.
–
बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेतले फैलावर. सोलापूरकरांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत होणारा पाणीपुरवठा बंद होणार. अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत कडक शब्दात सुनावले. पाणी पुरवठ्याची 882 कोटी रुपयांची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याचे अण्णा बनसोडे यांचे आश्वासन
रायगडच्या अलिबाग नागाव पारोडा येथे दोन दिवसांपूर्वी सहा जणांवर हल्ला करून पसर झालेला बिबट्या आज सकाळी नागाव पासून काही अंतरावर आक्षी साखरी येथे. शुक्रवारी सकाळी प्रातःविधीसाठी गेलेल्या दोघांवर हल्ला केल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल आतापर्यंत या बिबट्याने आठ जणांना जखमी केले आहे.
बेकायदा वाळू उपशाची माहिती अधिकार्याना का दिली -या कारणावरुन 7 ते 8 वाळू माफियांनी अॅड पाडुरंग तळेकर या वकिलावर जिव घेणा हल्ला मारहाण प्रकरणी सोना पराडे सह एकूण 8 वाळू माफियांवर टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय-
भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू असताना 6 जणांकडून तक्रारदारावर हल्ला
बीडच्या केज तालुक्यातील सुकळी गावातील अमर गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी सुरू असताना सरपंच नितीन गायकवाड आणि त्याचे सहकारी अक्षय गायकवाड, प्रदीप भिसे, अनिकेत गायकवाड, ज्ञानेश्वर गव्हाणे आणि रविराज खाडे यांनी अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली.
महानगरपालिकेतर्फे अंधेरी पूर्व (के पूर्व), सांताक्रूझ (एच पूर्व) आणि दादर, प्रभादेवी (जी उत्तर) विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामे सुरू. या कामासाठी आज, १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ या चोवीस तासांच्या कालावधीत के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला
एप्रिल महिन्यापासून पासून पुणे विमानतळ परिसरात अधूनमधून दिसणारा एक प्रौढ नर बिबट्या पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, RESQ Charitable Trust, Indian Air Force आणि Pune Airport Authorities यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून पकडण्यात आला.या बिबट्याने विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करून आत-बाहेर हालचाल चालू ठेवली होती.विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसर लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना करावा लागला
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. ९८ अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आलीय. त्यात सर्वाधिक ४४५ अर्ज ही एकट्या परभणी जिल्ह्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात त्यापैकी ४७ कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. उर्वरित अर्जाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं जातंय.
अंबरनाथ मध्ये एका दिवसात भटक्या श्वानांने आठ नागरिकांना चावा घेतला. अंबरनाथ पश्चिमेतील बालाजी नगर परिसरात ही घटना घडली. शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव चिंताजनक ठरत आहे.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात काही शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. श्वानांचा निर्बीजीकरण आणि नियमित लसीकरणाची नागरिकांकडून केली जात आहे. श्वान निर्बीजीकरण केंद्र काही दिवस बंद असल्याने अंबरनाथमध्ये ही प्रक्रिया ठप्प झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली असून, शहरातील निर्बीजीकरण आणि लसीकरण सुरू करण्याची तयारी नगरपालिका करत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
युती होण्यापूर्वीच जागावाटपा वरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे-भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यात जुंपली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये युतीत लढणार असल्याचे संकेत शिवसेना भाजप कडून देण्यात येत असतानाच आता …कल्याणमध्ये मात्र दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते आमने-सामने आले आहेत.
नाशिक शहरात तब्बल 1 हजार 270 झाडांवर कुऱ्हाड पडल्याचे महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांना झाडं अडथळा ठरत असल्याचे पालिकेने म्हणणं मांडलं. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नव्याने 17 हजार 680 वृक्षांची लागवड फाशीचा डोंगर परिसरात करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले. त्यामुळे निवडणुकीतील गोंधळ अजूनही निस्तारलेले नसल्याचे दिसून येते. अगोदर महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनपा निवडणूक या जानेवारी महिन्यात होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे सुमारे २ हजार ३५० कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. इच्छुक उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात शनिवारी आणि रविवारी कोअर कमिटीतर्फे मुलाखती घेतल्या जाणार आहे. यानिमित्ताने एकाच प्रभागातील अनेक स्पर्धक एकमेकांच्या पुढे येणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला आहे.