Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackrey : वन नेशन, वन इलेक्शन जनतेच्या डोक्यावर लादू नये – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीत राज्यात जे झालं ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही, आणि हे पटलेलं नसताना त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीने निवडणुका लादू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन वन इलेक्शनला त्यांनी ठाम विरोध दर्शवला.

Uddhav Thackrey : वन नेशन, वन इलेक्शन जनतेच्या डोक्यावर लादू नये -  उद्धव ठाकरे
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 2:03 PM

लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे, त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे होता कामा नये, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली. या ( विधानसभा) निवडणुकीत राज्यात जे झालं ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही, आणि हे पटलेलं नसताना त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीने निवडणुका लादू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन वने इलेक्शनला त्यांनी ठाम विरोध दर्शवला.

लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. मात्र काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्ष या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत,असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील, आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदान घ्यायला का घाबरता ?

मारकडवाडी साधं गाव आहे. मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला. संपूर्ण महाराष्ट्राने आम्हाला मतं दिली, प्रेम दिलं असं तुम्ही म्हणता, मग ईव्हीएमवर जी मतं पडली, तीच मतं बॅलेट पेपरवरही तुम्हाला येतील ना. लोकशाहीमध्ये मी कोणाला मत देत आहे, माझं मत कुठे जात आहे, हे मला कळलंच पाहिजे. माझा तो अधिकार आता हिरावून घेतला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. निवडणूक प्रक्रियेत बॅलेट पेपरवर जेव्हा मी शिक्का मारायचो, तेव्हा मी या व्यक्तीला, या नशाणीवरती शिक्का मारून मतदान केलंय हे मला कळायचं. आता मी बटण जरूर दाबतो, दिवाही नक्की लागतो, माझी रिसीटही दिसते, पण ती कुठे जाते ते कळत नाही, ती मोजली जात नाही. मत रजिस्टर कुठे झालंय ते मला कळत नाहीये.

त्यामुळेच लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांड

लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. मात्र काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्ष या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत,असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील, आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.