AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackrey : वन नेशन, वन इलेक्शन जनतेच्या डोक्यावर लादू नये – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीत राज्यात जे झालं ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही, आणि हे पटलेलं नसताना त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीने निवडणुका लादू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन वन इलेक्शनला त्यांनी ठाम विरोध दर्शवला.

Uddhav Thackrey : वन नेशन, वन इलेक्शन जनतेच्या डोक्यावर लादू नये -  उद्धव ठाकरे
uddhav thackeray
| Updated on: Dec 17, 2024 | 2:03 PM
Share

लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे, त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक हे होता कामा नये, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली. या ( विधानसभा) निवडणुकीत राज्यात जे झालं ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही, आणि हे पटलेलं नसताना त्यांच्या डोक्यावर अशा पद्धतीने निवडणुका लादू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. वन नेशन वने इलेक्शनला त्यांनी ठाम विरोध दर्शवला.

लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. मात्र काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्ष या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत,असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील, आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदान घ्यायला का घाबरता ?

मारकडवाडी साधं गाव आहे. मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला. संपूर्ण महाराष्ट्राने आम्हाला मतं दिली, प्रेम दिलं असं तुम्ही म्हणता, मग ईव्हीएमवर जी मतं पडली, तीच मतं बॅलेट पेपरवरही तुम्हाला येतील ना. लोकशाहीमध्ये मी कोणाला मत देत आहे, माझं मत कुठे जात आहे, हे मला कळलंच पाहिजे. माझा तो अधिकार आता हिरावून घेतला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. निवडणूक प्रक्रियेत बॅलेट पेपरवर जेव्हा मी शिक्का मारायचो, तेव्हा मी या व्यक्तीला, या नशाणीवरती शिक्का मारून मतदान केलंय हे मला कळायचं. आता मी बटण जरूर दाबतो, दिवाही नक्की लागतो, माझी रिसीटही दिसते, पण ती कुठे जाते ते कळत नाही, ती मोजली जात नाही. मत रजिस्टर कुठे झालंय ते मला कळत नाहीये.

त्यामुळेच लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये. महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी मांड

लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. मात्र काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्ष या विधेयकाला विरोध दर्शवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. एक देश एक निवडणूक याबद्दल त्यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट मत मांडत विरोध दर्शवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

अदानींचा मुद्दा असो किंवा देशातले आणखी काही महत्वाचे विषय असोत, त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विषय आणला जात आहे. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत,असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील, आणि ते जर आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. अशा व्यक्तीच्या अधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. निवडणूक आयुक्तसुद्धा निवडून आला पाहिजे. तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?