AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे म्हणाले आता ही शेवटची लढाई… ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं…हा निखाऱ्यावरचा प्रवास

आता ही शेवटची लढाई आहे, ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं असे म्हणत हा निखाऱ्यावरचा प्रवास असून तुम्ही सोबत आहात ना ? असा सवाल विचारात ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना विश्वासात घेतले असून पुढील लढाई जिंकण्याचा विश्वास दिला आहे

ठाकरे म्हणाले आता ही शेवटची लढाई... ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं...हा निखाऱ्यावरचा प्रवास
Image Credit source: Social Media
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 09, 2022 | 3:58 PM
Share

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह काही काळासाठी गोठवले गेल्याने शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे  (Uddhav Thackeray) दोन्ही गटाकडून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. एकीकडे नवे चिन्ह मिळवण्यासाठी धडपड केली जात असतांना पदाढीकाऱ्यांशी संवाद साधण्याचे काम दोन्ही गटाकडून केले जात आहे. अशातच ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं-संपलेललं नाणं असल्याचे म्हणत आपल्या कडे बाळासाहेबांसारखे खणखणीत नाणं असल्याचे म्हंटल आहे. दसरा मेळाव्यातील भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींवरच टीका करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांना देखील आव्हान दिलं आहे.

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत आपली शेवटची लढाई असल्याचे म्हंटले आहे.

आता ही शेवटची लढाई आहे, ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं असे म्हणत हा निखाऱ्यावरचा प्रवास असून तुम्ही सोबत आहात ना ?

असा सवाल विचारात ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना विश्वासात घेतले असून पुढील लढाई जिंकण्याचा विश्वास दिला आहे.

यावेळी बोलतांना मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले याचा आवर्जून उल्लेख ठाकरे यांनी व्हीसीमध्ये केला.

दरम्यान आपल्याकडून फुटण्याआधी खासदार मला म्हणत होते की पुढल्या निवडणुकीत मोदी यांच्या नावाचा आपल्याला वापर करावा लागेल.

मग माझा त्यांना सवाल आहे की आमच्यातुन फुटल्यानंतर त्यांच्या गटाला बाळासाहेबांच्या नावाची गरज का लागते ? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

नव्या चिन्हाबाबत दुसरीकडे प्रयत्न केले जात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची एकजूट कायम टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...