AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे म्हणाले आता ही शेवटची लढाई… ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं…हा निखाऱ्यावरचा प्रवास

आता ही शेवटची लढाई आहे, ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं असे म्हणत हा निखाऱ्यावरचा प्रवास असून तुम्ही सोबत आहात ना ? असा सवाल विचारात ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना विश्वासात घेतले असून पुढील लढाई जिंकण्याचा विश्वास दिला आहे

ठाकरे म्हणाले आता ही शेवटची लढाई... ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं...हा निखाऱ्यावरचा प्रवास
Image Credit source: Social Media
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 09, 2022 | 3:58 PM
Share

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह काही काळासाठी गोठवले गेल्याने शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे  (Uddhav Thackeray) दोन्ही गटाकडून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. एकीकडे नवे चिन्ह मिळवण्यासाठी धडपड केली जात असतांना पदाढीकाऱ्यांशी संवाद साधण्याचे काम दोन्ही गटाकडून केले जात आहे. अशातच ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं-संपलेललं नाणं असल्याचे म्हणत आपल्या कडे बाळासाहेबांसारखे खणखणीत नाणं असल्याचे म्हंटल आहे. दसरा मेळाव्यातील भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींवरच टीका करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदारांना देखील आव्हान दिलं आहे.

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत आपली शेवटची लढाई असल्याचे म्हंटले आहे.

आता ही शेवटची लढाई आहे, ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं असे म्हणत हा निखाऱ्यावरचा प्रवास असून तुम्ही सोबत आहात ना ?

असा सवाल विचारात ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना विश्वासात घेतले असून पुढील लढाई जिंकण्याचा विश्वास दिला आहे.

यावेळी बोलतांना मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले याचा आवर्जून उल्लेख ठाकरे यांनी व्हीसीमध्ये केला.

दरम्यान आपल्याकडून फुटण्याआधी खासदार मला म्हणत होते की पुढल्या निवडणुकीत मोदी यांच्या नावाचा आपल्याला वापर करावा लागेल.

मग माझा त्यांना सवाल आहे की आमच्यातुन फुटल्यानंतर त्यांच्या गटाला बाळासाहेबांच्या नावाची गरज का लागते ? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

नव्या चिन्हाबाबत दुसरीकडे प्रयत्न केले जात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची एकजूट कायम टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान