AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय’, उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय', उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
| Updated on: Mar 07, 2024 | 8:35 PM
Share

धाराशिव | 7 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत प्रत्युत्तर दिलं. धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे. जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचे नाही, असा नियम निवडणूक आयोगाने काढला आहे. निवडणूक आयोगाचे नाव मी धोंड्या ठेवले आहे. या धोंड्याने जो नियम काढला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाला लावा. भाजप लोकांना अयोध्येला घेऊन जाते. कर्नाटकमध्ये जय हनुमानचा नारा देत मोदींनी मते मागितले होते. त्यामुळे मोदींच्या मतदानाचा अधिकार पहिल्यांदा काढून टाका, असे आवाहन मी धोंड्याला करतो. शिवसेनेबाबतचा निकाल त्या लबाड नार्वेकरने दिला. तो माणूस आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता’

“मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या शेतकऱ्याच्या बाळाच्या डोक्यावर कर्ज घेऊन तो जन्माला येतो. त्यामुळे आता यावेळी फसलात तर अवघड आहे. शिवसेना देखील 25 वर्षांपासून फसली होती”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.