AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय’, उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय', उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 07, 2024 | 8:35 PM
Share

धाराशिव | 7 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत प्रत्युत्तर दिलं. धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे. जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचे नाही, असा नियम निवडणूक आयोगाने काढला आहे. निवडणूक आयोगाचे नाव मी धोंड्या ठेवले आहे. या धोंड्याने जो नियम काढला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाला लावा. भाजप लोकांना अयोध्येला घेऊन जाते. कर्नाटकमध्ये जय हनुमानचा नारा देत मोदींनी मते मागितले होते. त्यामुळे मोदींच्या मतदानाचा अधिकार पहिल्यांदा काढून टाका, असे आवाहन मी धोंड्याला करतो. शिवसेनेबाबतचा निकाल त्या लबाड नार्वेकरने दिला. तो माणूस आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता’

“मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या शेतकऱ्याच्या बाळाच्या डोक्यावर कर्ज घेऊन तो जन्माला येतो. त्यामुळे आता यावेळी फसलात तर अवघड आहे. शिवसेना देखील 25 वर्षांपासून फसली होती”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल