AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय’, उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

"मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय', उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
| Updated on: Mar 07, 2024 | 8:35 PM
Share

धाराशिव | 7 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या याच टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत प्रत्युत्तर दिलं. धाराशिवमध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री. पण त्यासाठी त्याला तुम्ही (नागरिकांनी) निवडून दिले पाहिजे. जय शाहचे क्रिकेटचे काय योगदान आहे? महाराष्ट्रातील मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही जय शाहाला अध्यक्ष केले. आमचे सरकार का पडले? कारण मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. मात्र आमच्यातले मिंधे, त्यांच्यासोबत पाय चाटत गेले. माझा गुजरातला विरोध नाही. पण तुम्ही गुजरात आणि भारतात भिंत उभी करत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार करायचे नाही, असा नियम निवडणूक आयोगाने काढला आहे. निवडणूक आयोगाचे नाव मी धोंड्या ठेवले आहे. या धोंड्याने जो नियम काढला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाला लावा. भाजप लोकांना अयोध्येला घेऊन जाते. कर्नाटकमध्ये जय हनुमानचा नारा देत मोदींनी मते मागितले होते. त्यामुळे मोदींच्या मतदानाचा अधिकार पहिल्यांदा काढून टाका, असे आवाहन मी धोंड्याला करतो. शिवसेनेबाबतचा निकाल त्या लबाड नार्वेकरने दिला. तो माणूस आता भाजपकडून निवडणुकीला उभा राहणार आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता’

“मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. शेतकरी प्रश्न, आरक्षण या विषयावर या नेत्यांनी मोदींच्या तोंडावर राजीनामा मारायला पाहिजे होता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या शेतकऱ्याच्या बाळाच्या डोक्यावर कर्ज घेऊन तो जन्माला येतो. त्यामुळे आता यावेळी फसलात तर अवघड आहे. शिवसेना देखील 25 वर्षांपासून फसली होती”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.