AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update: वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती, पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी अन् गारपीटचे संकट, महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Weather Update: अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त राज्याच्या दिशेने येत आहे. तसेच गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे.

Weather Update: वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती, पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी अन् गारपीटचे संकट, महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Image Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 05, 2025 | 8:36 AM
Share

Maharashtra Weather Today : महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 40 अंशाच्या वर पोहचले आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबईतील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील सगळ्याच भागांत सोमवारी पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 3 दिवस पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त राज्याच्या दिशेने येत आहे. तसेच गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उष्ण आणि दमट वाऱ्याच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदा विदर्भात वारंवार अवकाळी पावसाचे संकट येत आहे. आता पुन्हा नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, गोंदिया या भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. परंतु अवकाळीमुळे तापमानात काही प्रमाणात घसरण होणार आहे. या भागांत कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज आहे.

पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट

पुण्यात उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. मंगळवारपासून चार दिवस मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. पुण्यातील कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. तर किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील काही गावांना रविवारी अवकाळी पावसासोबत गारपिटीचा तडाखा बसला. या गारपिटीमुळे पपई, केळी तसेच फळपिकांचे नुकसान झाले आहे. तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. पवनार, सुरगाव, कान्हापूर, रेहकी आदी गावांत गारपीट, अवकाळी पाऊस झाला आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.