AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वंचितचं ठरलं, युतीबाबत मोठी घोषणा, समोर आला नेमका प्लॅन!

वंचितकडून आज पुण्यात महिला कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पक्षाची योजना काय असेल? यावर अंजली आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

मोठी बातमी! वंचितचं ठरलं, युतीबाबत मोठी घोषणा, समोर आला नेमका प्लॅन!
VBA Anjali Ambedkar
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 10, 2025 | 6:14 PM
Share

वंचितकडून आज पुण्यात महिला कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पक्षाची योजना काय असेल? युती कोणत्या पक्षासोबत करणार याबाबतही अंजली आंबेडकर यांनी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महिला कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना अंजली आंबेडकर यांनी म्हटले की, महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत आहे. वंचितांची वंचितता वाढतं असताना स्त्रियांचेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न हाताळण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी सक्षमपणे उभी राहील. याची ही पुणे शहरातून सुरुवात होत आहे.

पुढे बोलताना अंजली आंबेडकर म्हणाल्या की, ‘लोकसभा निवडणूकांमध्ये संविधान वाचवण्याच्या एका मुद्द्यावर आंबेडकरी मतदान हे मोठ्या संख्येने काँग्रेस, महाविकास आघाडीकडे गेले होते. पण लोकसभेनंतर महाविकास आघाडीतील पक्षाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यात आरक्षणासंदर्भात, तसेच वंचितांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवला नाही. तेव्हापासूनच इथल्या मतदारांमध्ये मोठी निराशा झालेली आहे. यामुळे आता मतदार मोठ्या आशेने वंचित बहुजन आघाडीकडे बघू लागली आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणासोबत युती?

अंजली आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत युती करणार याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीने गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने जाहीर केलं आहे की, भाजप आणि भाजपसोबत सत्तेत असलेले पक्ष सोडून, इतर कुठल्याही पक्षाबरोबर युती करण्याचा आम्ही निर्णय घेऊ. याचे स्वातंत्र्य स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

कोथरूडमधील मुलीला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचित महिला आघाडीने पोलिसांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. यावर बोलताना अंजली आंबेडकर म्हणाल्या की, ‘आंबेडकरी चळवळीतल्या महिला रक्षाबंधन करत नाहीत. याचं कारण स्वतःला आपलं मानन आणि दुसरं कोणालातरी आमची रक्षा करा असं सांगणं, ही वैचारिक दृष्ट्या आम्हाला न पटणारी भूमिका आहे. पण आत्ता आम्ही जी कृती करत आहे, ती म्हणजे महिलांचं रक्षण करण ज्या खात्याची जबाबदारी आहे, त्याच खात्याकडून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये, तीन मुलींना अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत. संविधानाची मूल्य आणि कायद्याची जबाबदारी जर पोलिसांना कळत नसेल, तर त्यांना जी सांस्कृतिक भाषा कळते. अशा भाषेमध्ये रक्षाबंधन करून तरी ते जबाबदारी घेतात का? हे बघण्यासाठी रक्षाबंधन साजरे करण्यात येत आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच