AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Train : वंदेभारतने प्रवास करताना ही चूक कधी करु नका, अन्यथा होईल तुरुंगवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनऊ आणि जोधपूर ते अहमदाबाद ( साबरमती ) या दोन नव्या वंदेभारत एक्सप्रेसना 7 जुलै रोजी गोरखपूर येथून हिरवा झेंडा दाखविला.

Vande Bharat Train : वंदेभारतने प्रवास करताना ही चूक कधी करु नका, अन्यथा होईल तुरुंगवास
vande bharat Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 12, 2023 | 9:01 PM
Share

मुंबई : वंदेभारत एक्सप्रेसने रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासाचे नवे दालन उपलब्ध केले आहे. वंदेभारतही ( Vande Bharat Express ) देशांतर्गत तयार करण्यात आलेली विना इंजिनाची ( Engineless Train ) पहिली सेमी हायस्पीड ट्रेन ( Semi Hi Speed Train ) असून या ट्रेनचा वेग ही या ट्रेनची खासीयत आहे. परंतू या ट्रेनचा आणि इतर भारतीय ट्रेनच्या प्रवासात एक फरक आहे. या ट्रेनचे नियम थोडे वेगळे आहेत. ते जर पाळले नाहीत तर तुम्हाला अटक होऊ शकते आणि तुरुंगातही जावे लागू शकते. का ते पाहा….

वंदेभारत एक्सप्रेस आता 25 राज्यांमध्ये धावत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनऊ आणि जोधपूर ते अहमदाबाद ( साबरमती ) या दोन नव्या वंदेभारत एक्सप्रेसना 7 जुलै रोजी गोरखपूर येथून हिरवा झेंडा दाखविला. आतापर्यंत देशात 25 वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. पहिली वंदेभारत नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 18 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरु करण्यात आली होती.

काही वंदेभारतचा क्षमतेपेक्षा कमी वेगाने प्रवास

यातील बहुतांशी वंदेभारत एक्सप्रेसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वंदेभारतपैकी काही वंदेभारत तिच्या पूर्ण वेग क्षमतेमध्ये चालविण्यात अडचण येत आहे. कारण अनेक ठीकाणी रुळांच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली नाही. नुकतीच कोकण मार्गावर सुरु केलेली सीएसएमटी ते मडगांव ( गोवा ) वंदेभारत अत्यंत कमी वेगाने चालविण्यात येत आहे. प्रवाशांच्या वेळेत फारसी बचत होत नसल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील पाच वंदेभारत पाहा

मुंबईत मुंबई सेंट्रल ( ट्रेन क्र. 20901) ते गांधीनगर मार्गावर पहिली वंदेभारत सुरु करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर ( ट्रेन क्र. 20826) ते बिलासपुर मार्गावर वंदेभारत सुरु झाली. त्यानंतर मुंबई ( ट्रेन क्र. 22223) ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ( ट्रेन क्र. 22225) ते सोलापूर अशा दोन वंदेभारत एकाच दिवशी सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबई ( ट्रेन क्र. 22229) ते मडगाव ( गोवा ) ही वंदेभारत कोकण मार्गावर सुरु करण्यात आली.

वंदेभारतने प्रवास करताना या गोष्टी ध्यानात घ्या

-कन्फर्म तिकीट प्रवाशांनाच प्रवासाची अनुमती

– वंदेभारतमध्ये कोणतीच सवलत नाही, पाचवर्षांच्या वरील मुलास पूर्ण तिकीट लागेल

– रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा पासवर राजधानी आणि शताब्दी सारख्याच सुविधा मिळतील

– सुरक्षेसाठी प्रत्येक कोचमध्ये एक सुरक्षारक्षक तैनात असेल

– अस्वच्छता केल्यास प्रवाशाला पाचशे रुपयांचा दंड किंवा दंड आणि तुरुंगवास दोन्ही शिक्षा एकत्र होतील.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.