AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला भेडसावतोय नवा त्रास, परिस्थिती पूर्ववत कधी होणार?

महाराष्ट्रात पावसाळा सुरु झाल्यानंतर भाज्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत. विशेष म्हणजे टोमॅटोचे भाव तब्बल चार पटीने वाढले आहेत. तसेच इतर भाज्यांचे देखील भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपुढे आता महागाईचं नवं संकट उभं राहिलं आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला भेडसावतोय नवा त्रास, परिस्थिती पूर्ववत कधी होणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 26, 2023 | 4:15 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याची 20 ते 22 तारीख उजाडली तरी पाऊस आलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली होती. पावसाची वाट पाहत-पाहत तो आलाच नाही तर? अशी भीती अनेकांना वाटू लागली होती. पण सुदैवाने उशिरा का असेना, पण पाऊस दाखल झाला. शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला. तर शहरी भागातील नागरिकांची उकाड्याने सुटका झाली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तर पाऊस चांगलाच कोसळतोय. यााशिवाय राज्यभरात मान्सून आता दाखल झालाय. पाऊस आला ही चांगली गोष्ट आहे. पण हा पाऊस सोबतीला महागाई घेऊन आलाय. पावसानंतर भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

मुंबईत भाज्यांचे दर किती?

मुंबईसह अनेक शहरात पावसाने हजेरी लावल्यानंतर भाज्यांचे दर वाढले आहेत. पूर्वी 60 ते 80 रुपये किलोने विकला जाणारा भाजीपाला आता 120 ते 140 रुपये किलो आहे. पाऊस पडल्यानंतर भाज्यांचे दर नेहमीच वाढतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण पावसात भाज्या कमी असतात. पूर्वी 40 ते 50 रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो आता 80 ते 100 रुपये किलोने विकले जात आहेत.

पावसानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात टोमॅटो खराब झाल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला कमी येत आहे. त्यामुळे किंमत वाढली आहे.

नाशिकमध्ये भाज्यांचे दर किती?

नाशिकमध्येही भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून भाज्या आता सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जाताना दिसून येत आहे. मान्सून उशिराने दाखल झाला. त्याचप्रमाणे पाऊस आला नसल्याने स्थानिक आणि जवळच्या भागातून येणाऱ्या भाज्या बाजारात कमी प्रमाणात येत आहेत. बाहेरून सगळा भाजीपाला येत असल्याने त्याचा ट्रान्सपोर्टेशन आणि इतर चार्ज बघता त्या भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. हे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसते आहे. त्यामुळे सामान्य माणसासमोर भाज्या खाव्या तरी कशा? असा प्रश्न पडला आहे.

नाशिकमधील भाज्यांचे दर प्रतिकिलो

टोमॅटो – 100 किलो सिमला मिरची – 120 किलो काकडी – 60 किलो भेंडी – 80 किलो गवार – 100 किलो ढेमस – 100 किलो वांगी – 60 किलो

15 ते 20 रुपये प्रति किलो टोमॅटोचे भाव चार पटीने वाढले

राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे महिन्याभरापर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतामधला टोमॅटो अक्षरशः गुरांना खाऊ घालण्याची वेळ आली होती. बाजारामध्ये टमाट्याची आवक आज मात्र घटल्यामुळे टमाट्याचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास चार पटीने वाढल्याचे बघायला मिळत आहे. जे टमाटे महिन्याभरापूर्वी 15 ते 20 रुपये प्रति किलोंना विकले जात होते तेच टमाटे आज बाजारांमध्ये 80 ते 90 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत.

पुण्यात भाज्यांचे दर काय?

पुण्यात पालेभाज्यांच्या घरात सरासरी 25 ते 30 रुपये तर फळबाजांच्या दरात देखील 35 रुपयांची सरासरी वाढ झाली आहे. काल एका दिवसात पुण्यात 90 ट्रकपेक्षा देखील जास्त भाज्यांची आवक झाली. भाज्यांची मागणी वाढल्याने हे दर पुढील काही दिवस असेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस