AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात

राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात
vijay wadettiwar
| Updated on: Apr 12, 2021 | 10:53 AM
Share

नागपूर: राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

मृतदेहांचा खच पडेल

विजय वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत संवाद साधताना हा सवाल केला आहे. वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यभर गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

14 दिवसाचा लॉकडाऊन हवाच

आठवडाभराचा लॉकडाऊन व्हावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. परंतु आठ दिवसाच्या लॉकडाऊनने काहीही होणार नाही. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर किमान 14 दिवसाचा लॉकडाऊन असला पाहिजे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. मात्र, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच होईल. लॉकडाऊन करताना कुणाला काय मदत करायची याचा विचार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याचा आढावा घेत असून येत्या दोन चार दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

15 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा निर्णय

मे अखेर पर्यंत राज्यात कोरोनाची विस्फोटक परिस्थिती राहिल. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. राज्यात शंभर टक्के लॉकडाऊन होणार असल्याचं सांगतानाच उद्या गुढीपाडवा आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

लोकलचाही निर्णय घेणार

लॉकडाऊन करताना काही गोष्टींना सूट देऊन चालणार नाही. याकाळात मुंबईतील लोकलवर निर्बंध लावायचे की नाही, याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये त्याबाबत चर्चा होईल. कारण मुंबईतील लोकलची गर्दी थांबवावीच लागणार आहे, असंही त्यांनी सांगेल.

उत्सव कशाला

राज्यात लस नाही. लोक लसीची प्रतिक्षा करत आहेत. माणसं मरत आहेत. मग लसीकरण उत्सव कशाला? असा सवाल करतानाच कोरोनावर व विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. त्यासाठी इतकी घाई कशाला?, असा सवालही त्यांनी केला. लॉकडाऊन आणि लसीच्या पुरवठ्याबाबत कुणी राजकारण करू नये. कुणी उपकाराची भाषा करत असेल तर ती पदाशी बेईमानी ठरेल, असंही ते म्हणाले. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

नर्स, डॉक्टर आभाळातून पडणार नाही

राज्यात बेड्सची कमतरता आहे. बेड्स एका दिवसात वाढवता येतीलही. परंतु, नर्स आणि डॉक्टर कुठून आणणार? नर्स आणि डॉक्टर्स काही आभाळातून पडणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनीच याचा विचार करावा. विनाकारण गर्दी करू नये. ताप अंगावर काढू नये, तात्काळ उपचार घ्यावेत आणि कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; फडणवीसांचा हल्लाबोल

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅर्टनचा लॉकडाऊन?

मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

(vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...