AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या कुशीत दोन लेकरं, गावात एकही चूल पेटली नाही, हृदयपिळवून टाकणारा..

Dharashiv Ashwini Paul Case : कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या निर्णयाने मोठी खळबळ उडाली. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केली. सासरच्या लोकांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता.

कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या कुशीत दोन लेकरं, गावात एकही चूल पेटली नाही, हृदयपिळवून टाकणारा..
Ashwini Paul
| Updated on: Sep 06, 2026 | 9:16 AM
Share

खवड्या डोंगरावरील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावरही धक्कादायक घटना घडली. कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी नळदुर्ग किल्ल्यावर जाऊन थक करणारा निर्णय घेतला. आपल्या तीन मुलांसह त्यांनी किल्लावरून उडी घेतली. ज्यात एक मुलगी, मुलगा आणि अश्विनी यांनी जगाचा निरोप घेतला. एका मुलीवर धाराशिवमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तिचीही झुंज संपली. कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या खासगी आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठा कलह सुरू होता. मुंबईतील नोकरी सोडून त्या आपल्या आई वडिलांच्या घरी तीन मुलांना घेऊन राहत होत्या. सासरच्या लोकांकडून त्यांना प्रचंड त्रास दिला जात होता. अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळतंय. या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे.

उमरगा तालुक्यातील व्हंताळ माहेर असलेल्या ठिकाणी अश्विनी पौळ यांच्यासह त्यांच्या दोन लेकरांचा चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आली. यादरम्यान संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होते. अश्विनी यांच्या चितेवर त्यांचा भाऊ सूर्याजी मोहित यांनी मुखाग्नी दिला. आईच्या कुशीत वाढलेल्या लेकरांना आईसोबतच जगाचा निरोप घेताना पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.

व्हंताळ गावात या घटनेनंतर एकाही घरी चूल पेटली नाही. दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यामध्ये प्रवेश केला. यादरम्यान त्यांच्यासोबत केक आणि काही चॉकलेटही होती. मात्र, किल्ल्याच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना केक वरती घेऊन जाऊ दिला नाही तर त्यांनी किल्ल्याच्या गेटजवळच आपल्या लेकरांसोबत केक कट केला आणि त्यांना खाऊ घातला.

किल्ल्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, माझा नवरा मागून येत आहे. अश्विनी पौळ यांचे वडील पेशाने शिक्षक आहेत. आपल्या मुलीसोबत नक्की काय घडत होते, हे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये अश्विनी या नोकरी करत होत्या. मात्र, नवऱ्याने त्यांच्यावर ही नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला. मुंबईतील नोकरीच्या राजीनामा देऊन त्या गावी परतल्या होत्या. मात्र, सासरच्या लोकांकडून त्यांना त्रास देणे सुरूच होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...